विदर्भातील जिल्हयांत पूर्वपार पध्दतीने भात शेताच्या जमिनीच्या वरच्या भागात मातीचे बांध करुन छोटे जलाशय तयार करतात व त्यांत पाणी साठवितात. साठविलेले पाणी आवश्यकतेनुसार जलाशयाच्या खालच्या भागातील भात शेतीला देतात. या छोटया तलावास विदर्भात बोडी असे म्हणतात. या बोडीमध्ये काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार लहान प्रमाणांत मत्स्य व्यवसाय देखील करतात.
पूर्वपांर बांधलेल्या बोडीची आता फुटतूट झाल्याने तसेच त्यात गाळ साठलेला असल्याने या जुन्या बोडींचे खोलीकरण व नूतनीकरण करणे आवश्यक ठरले आहे. बोडींचे खोलीकरण / नूतनीकरण करणे हे शेतक-यांना आर्थिक दृष्टया शक्य नसल्याने ते शासनामार्फत करुन दिले जाते. पावसाअभावि भात पिकास पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात मोठया प्रमाणात घट होते अशा वेळी बोडीतून सरंक्षक पाणी दिल्यास शेतक-यांचे नुकसान टाळले जाते. बोडी ही वैयक्तिक लाभाधारक योजनेतंर्गत मोडते. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयामध्ये जलसंधारणाचा एक परिणामकारक उपाय म्हणून जुन्या बोडीचे नुतनीकरण केले जाते.
बोडीची उंची 1.5 मीटर व 2 मीटर अशा 2 प्रकारात निश्चित केलेली आहे.
त्यानुसार बोडीचा तपशिल खालील प्रमाणे.-
अ.क्र. |
बाब |
1.5 मी. उंचीची बोडी |
2 मी. उंचीची बोडी |
1 |
मुख्य बांधाची लांबी (3 प्रकार) |
50 मी. किंवा 70 मी. किंवा 100 मी. |
50 मी. किंवा 70 मी. किंवा 100 मी. |
2 |
मुख्या बांधाची माथा रुंदी |
1 मी. |
1 मीटर |
3 |
बाजू उतार (आतील व बाहेरील अशा दोन्ही बाजूस) |
1 : 1.5 |
1 : 1.5 |
स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/20/2020