অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतजमिनीवर चार्‍याची पिके

शेतजमिनीवर चार्‍यासाठी पिके लावता येतील. फक्त गवते लावण्याऐवजी गवत व शिंबी वर्गातील वनस्पतींचे मिश्र पीक घेणे, त्यांच्या पूरक कार्याुळे जास्त चांगले. मिश्रणाने गुरांना लुसलुशीत, पाचक, सत्त्वयुक्त आहार मिळतो. तसेच केवळ तृणधान्याचे किंवा कडधान्याचे पीक घेण्याऐवजी मिश्र पीक घेतल्याने उत्पादन जास्त मिळते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. वैरण अधिक मिळते. शिंबी पिके पक्व झाल्यावरही त्यांच्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता तृणांच्या मानाने टिकून राहते. शिंबी पिकात प्रथिने जास्त असतात. त्यामुळे चार्‍याची गुणवत्ता सुधारते. शिवाय ते मातीत नत्राचा पुरवठा करतात. मातीमधील नत्रे वाढतात, तिचा पोत सुधारतो, मातीची धूप होण्यावर नियंत्रण बसते, हवामानात होणारे तीव‘ फेरफ ार सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते. तृणधान्याबरोबर कडधान्ये लावल्याने चार्‍याची गुणवत्ता सुधारता येते. मटकी व कुळीथ कमीतकमी पाण्यावर येणारी कडधान्ये आहेत. कुळथाचे पीक खरीप हंगामात घेतात. हे भारी काळ्या जमिनीपासून हलक्या, रेताड व खडकाळ जमिनीत वाढू शकत असले तरी बहुधा हलक्या जमिनीवर पीक घेतले जाते. जिथे इतर तृणधान्ये किंवा कडधान्ये येऊ शकत नाहीत तिथे कुळीथ घेतात. याचे दाणे भरडून, भिजवून किंवा शिजवून दुभत्या आणि कष्ट करणार्‍या गुरांना खुराक म्हणून चारतात. पाला व भुसकट जनावरांना खायला देतात. दाणे उकडून घोड्यांना खायला देतात. गुरे व मेंढ्यांना पाने हिरवा चारा म्हणून उपयोगी पडते. बाजरी व कुळथाचे मिश्र पीक घेता येते. मटकीचे पीक पावसाळ्यात घेतात. कांडे व पाने गुरांना खायला देतात. मूग व उडीद खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेता येतात. याची पाने व कांडे गुरांना सकस आहार आहे. वालाची पाने व कांडे तसेच डाळीचा भरडा व कोंडा दुभत्या जनावरांना खायला देात. गुजरात, सातारा व बेळगाव जिल्ह्यांतून गवार चार्‍यासाठी लावतात. दाणे व हिरवा पाला गुरांना व घोड्यांना देतात. वाटाण्याचे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतात. देशावर व गुजरातेत याची पाने व कांडे गुरांना खायला देतात. मेथीची पाने व देठ गुरांसाठी उत्तम आहार आहे. चवळीचे चार्‍याचे पीक बाजरी, ज्वारी किंवा मक्याबरोबर खरिपात घेतात. चवळीची हिरवी पाने व कांडे दुभत्या जनावरांसाठी चांगला आहार असतो. मोहरीचे पीक हिवाळ्यात घेतात. ते लवकर तयार होते आणि गुरांना सकस, हिरवा चारा अल्पकाळात उपलब्ध होतो. याशिवाय धैंचा, लसूणघास, बरसीम आणि

स्टायलो या शिंबी कुलातील वनस्पती चार्‍यासाठी लावल्याने चार्‍याची तसेच जमिनीची गुणवत्ता सुधारते. शेतजमिनीवर जिथे चार्‍यासाठी पिके लावण्यास वेगळी जमीन उपलब्ध नसेल तिथेही देान मु‘य नगदी पिकांधील काळात लवकर वाढणारे चार्‍याचे पीक एकटे किंवा मिश्रणात लावता येते. गहू, ज्वारी फेरपालटीत दोन कालावधी उपलब्ध असतात. 1) एप्रिल  ते जून, 2) ऑक्टोबर ते नोव्हेंबर. पहिल्या कालावधीत ज्वारी+ चवळी, मका+चवळी किंवा बाजरी +चवळी असे मिश्र पीक घेता येते व प्रती हेक्टरी 300 ते 350 क्विंटल चारा मिळतो. दुसर्‍या कालावधीत चार्‍याचे टर्निप व लवकर तयार होणारी मोहरी लावून प्रती हेक्टरी 250 ते 300 क्विंटल उत्पन्न मिळते. काही भागात पावसाळ्यातील ओल राखून त्यावर रब्बी पीक घेतात. या ठिकाणी चार्‍याचे 40 ते 45 दिवसांत वाढणारे पीक घेता येते. चवळी, ज्वारी, गवार, मटकी यांसारखी पिके लावल्यास हेक्टरी 150 ते 200 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो. चार्‍याचे पीक काढल्यानंतर हरभरा, आळशी, गहू, करडई इत्यादी मु‘य पीक घेता येते. शहराच्या जवळपास दूधदुभत्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशा ठिकाणी शेतजमिनीवर चार्‍याची पिके घेणे फायदेशीर असते. गुरांना वर्षभर रुचकर, लुसलुशीत, सत्त्वयुक्त चारा वर्षभर मिळणे जरुरीचे असते. प्रत्येक हेक्टर मधून चार्‍याचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे असा उद्देश असतो.

दूधदूभत्याच्या व्यवसायासाठी चार्‍याचे उत्पादन करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात.

1. एका गुणवत्तेचा चारा वर्षभरा मिळावा लागतो.

2. चार्‍याची पिके अधिक उत्पादन देणारी असावीत.

3. सर्व क्षेत्रासाठी सिंचन व्यवस्था असावी.

4. खते तयार करण्याची व देण्याची व्यवस्था असावी.

वर्षभर चारा मिळविण्यासाठी एका मागून एक तीन किंवा चार पिके घेता येतात. वेगवेगळ्या जातींच्या वाढीचा काळ वेगवेगळा असतो. त्याचा उपयोग करून वर्षभर चारा मिळण्याची व्यवस्था करण्यात येते. एका पिकाचा आयुष्यक‘म पूर्ण होण्याआधी दुसरे पीक त्यामध्ये लावले जाते. त्याचप्रमाणे एका मागून एक फेरपालट करून चार्‍याची पिके घेता येतात. ज्वारी, बाजरी, मका, गिनी गवत, पॅराग‘ास , र्‍होडस् गवत, लसूणघास,बरसीम, गवार, मटकी, चवळी, मोहरी इ. अधिक उत्पादन देणारी पिके लावता येतात. चार्‍याचे उत्पादन वाढविण्यासाठी भरघोस उत्पादन देणार्‍या बियाणांचे उत्पादन वाढविणे जरुरीचे आहे. पुष्कळशा नव्या चांगल्या जाती मुळांचे किंवा खोडांचे फुटवे लावून विकसित केल्या आहेत. त्यामुळे त्यांची बी तयार करण्याची क्षमता अत्यल्प असते. शिवाय गवतांना फुले येऊ न देता ती वारंवार कापली जातात. त्यामुळे फुले येऊन बी धरण्याच्या प्रकि‘येवर नियंत्रण पडते. ज्या विशिष्ट भागात विशिष्ट गवते व द्विदल वनस्पती आढळतात तेथेच त्यांची बियाणे मिळविण्यासाठी लागवड केली तर चांगले. विकसित केलेल्या नवीन प्रजातींचे बी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणेही गरजेचे आहे. लागवडीची चार्‍याची गवते व शिंबी वनस्पती आणि कुरणातील वन्य गवते व शिंबी वनस्पती यांचे बियाणे उत्पादन वाढविण्यासाठी निश्‍चित योजना आखून प्रयत्न केले पाहिजेत. शेतकर्‍यांना चार्‍यांच्या बियाणांचे उत्पादन करणे हे एक नवे क्षेत्र खुले आहे. पुष्कळ ठिकाणी शेतजमीन खारी, चोपण असते किंवा पाणथळ, दलदलीची, आम्लधर्मी किवा अल्कधर्मी असते. अशा ठिकाणी चार्‍यासाठी विशिष्ट गवते व शिंबी वनस्पती लावता येतील.

सोडिअम क्षार असलेली खारी जमीन - बरसीम, मेथी, शेवरी,नेपियर ्हायब‘ीड बाजरी, मकचारी

खारी जमीन - ज्वारी, नेपियर, हायब‘ीड बाजरी, लसूणघास, शेवरी, पॅरागवत, ओट

आम्लधर्मी जमीन - चवळी, दीनानाथ गवत, मका, नेपियर- हायब‘ीड बाजरी, गिनी गवत

चुना असलेली जमीन - ज्वारी, बाजरी, शेवरी, नेपियर-हायब‘ीड बाजरी.

आम्लधर्मी जमिनीत चुना घातला असता तिची उत्पादन क्षमता वाढते.

ज्वारी,जोंधळा,शाळू

 

ज्वारीची लागवड चार्‍यासाठी केली जाते. ज्वारीचा मु‘य फायदा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ती सुप्तावस्थेत राहते आणि कडक अवर्षणानंतर अल्पावधीत वाढू शकते. वाढणारा शेंड्याचा कोंब काढल्याने पिकाची अवर्षणाला तोंड देण्याची क्षमता कमी होते. ज्वारीचे पीक बर्‍याच प्रकारच्या जमिनींवर येऊ शकते. जमिनीनुसार वेगवेगळ्या जाती लावल्या जातात. पाण्याचा निचरा चांगला होणे मात्र जरुरीचे असते. ज्वारीची मुळे मातीत खोल जातात व खालच्या थरातून पाणी शोषून घेऊ शकतात. या पिकाला जमिनीत सोडिअम कार्बोनेटचे क्षार असले तरी चालते. खाट्या ठेवलेल्या काळ्या जमिनीत खत घालण्याची जरूर नसते. शिंबीवर्गीय पिकाबरोबर फेरपालट केला असता मातीतील अन्नद्रव्ये वाढतात. चारा व मुरघासासाठी बर्‍याच वेळा चवळीसार‘या शिंबीवर्गीय पिकाबरोबर लावतात. चार्‍यासाठी ज्वारी लावताना बी दाट पेरले जाते. त्यामुळे खोडे खूप उंच

( 15 फुटांपर्यंत) वाढतात. उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर चार्‍यासाठी ज्वारी लावतात. पीक फुलावर आल्यावर ताटे कापून ती ओली वैरण म्हणून किंवा मुरघास करून गुरांना खायला घालतात. फुलावर येण्यापूर्वी ताटे गुरांना खाऊ घातल्यास त्यातील धुरोन या विषारी पदार्थाुळे विषबाधा होऊ शकते. कडबा उन्हात वाळवल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने अल्प प्रमाणातील धुरीनचे प्रमाण नाहीसे होते. बाजरी किंवा भातापेक्षा ज्वारीची ताटे अधिक सकस असतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी खरिपात निळवा व उतावळी,रब्बीत दगडी व मालदांडी आणि उन्हाळ्यात हंडी व काळबोंडी या जाती लावतात. या सर्व जाती पेरल्यानंतर 60 ते 70 दिवसात फुलावर येतात. धान्य काढून घेतल्यानंतर राहिलेली ज्वारीची ताटे व नंतरची नवी फूट हिवाळ्यात गुरांना चांगला चारा पुरवते. जमिनीची सुपीकता व पावसाप्रमाणे ज्वारीच्या गोड जातीपासून 25000 ते 75000 कि. प्रती हेक्टरी हिरवा चारा मिळतो.

बाजरी

 

बाजरीला कोरडी हवा व कमी पाऊस लागतो. हलक्या जमिनीत व कमी पाण्यात हे पीक घेता येते. कमी पावसाच्या प्रदेशात जिथे ज्वारी, मका येऊ शकत नाही, तिथे बाजरी लावता येते. चार्‍यासाठी लागवड करावयाची असेल तर 500 मि.मी. पाऊस आवश्यक असतो. बाजरीचे पीक पुष्कळ प्रकारच्या जमिनींवर लावता येते. हे पीक अतिशय आम्लयुक्त जमिनीवर वाढते. पिकाची क्षार सहन करण्याची क्षमता चांगली आहे. सिंधमध्ये खार्‍या जमिनी सुधारण्यासाठी बाजरी लावतात. पाण्याचा निचरा चांगला होणार्‍या सुपीक जमिनीवर पिकाची उत्तम वाढ होते. उशिरा पक्व होणारी बाजरीची जात चांगली समजली जाते. कारण तिच्यावर पाला जास्त असतो. चार्‍यासाठी बियाणे दाटीने पेरतात. त्यामुळे तणे दबली जातात. हिरव्या चार्‍यासाठी 6 ते 7 आठवड्यांच्या अंतराने कापणी करता येते. पीक फुलोर्‍यावर आल्यावर कापणी करतात. यापासून हेक्टरी 25,000 ते 30,000 कि. ओली वैरण मिळते. बाजरीचा मुरघास करता येतो. फुले आल्यावर 3 आठवड्यांनी कापणी करून मुरघास करतात. चार्‍यासाठी बहुधा मोठ्या दाण्यांचे प्रकार लावतात. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने भरपूर उंच वाढणारा व वर्षातून दोन वेळा चार्‍याचे उत्पादन देऊन धान्यही मिळू शकेल, असा बाजरीचा र?कार विकसित केला आहे. चार्‍याचे पहिले उत्पादन पेरणीपासून अवघ्या 50 ते 55 दिवसांत हाती येते. त्यावेळी हेक्टरी 50-75 टन ओला चारा मिळतो. त्यानंतर 50 दिवसांनी ओल्या चार्‍यासाठी पुन्हा कापणी करता येते. हेक्टरी 30 ते 40 टन चारा मिळतो. ओल्या चार्‍यासाठी कापणी न केल्यास हेक्टरी 20-25 क्विंटल बाजरी व वैरण मिळते. पंजाब, गुजरात,तामिळनाडू, आंध‘ प्रदेश या राज्यांतून पावसाळी हंगामात चार्‍यासाठी बाजरी लावली जाते. जनावरे व कोंबड्यांचे खाद्य म्हणून बाजरीचा उपयोग करतात. बाजरीच्या दाण्यांध्ये 12.4% पाणी, 11.6% प्रथिने, 5% स्निग्ध पदार्थ, 67.1% कर्बोदके, 1.2 %तंतू आणि 2.7 % खनिजे असतात. गुजराथेत धान्य व हिरवी ताटे दुभत्या जनावरांना खाऊ घालतात. हिरव्या चार्‍यात प्रथिनांचे प्रमाण 11% असते.

मका

 

ज्वारीनंतर मक्याची लागवड चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र मका लावला जातो. पण गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात याची विशेष लागवड आहे. 25 सेंटिमीटरपासून 500 सें.मी.पर्यंतच्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात मक्याची लागवड केली जाते. परंतु वाढीच्या काळात 50 ते 70 सें.मी. पाऊस पिकाला पोषक असतो. हे मु‘यत: खरीप हंगामातील पीक आहे पण कडाक्याची थंडी नसलेल्या प्रदेशात विहिरीच्या किंवा कालव्याच्या पाण्यावर वर्षभर मक्याची लागवड करता येते. चांगल्या निचर्‍याच्या खोल व सुपीक जमिनीत मक्याचे पीक चांगले

येते. परंतु चांगल्या निचर्‍याच्या खोल,भारी पासून हलक्या रेताड कोणत्याही जमिनीत मक्याची लागवड करता येते. मक्याच्या खरीप पिकाची पेरणी पावसाच्या पहिल्या सरी पडल्यावर करतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी उन्हाळी मका मार्च-एपिलमध्ये पेरतात. वैरणीच्या पिकासाठी बी फोकून पेरण्याची पद्धती पुष्कळ ठिकाणी प्रचलित आहे. वैरणीच्या पिकासाठी हेक्टरी 35-40 कि.बियाणे लागते. मक्याच्या रब्बी व उन्हाळी पिकाला पाणी द्यावे लागते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे 5-10 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. पावसाने ताण दिल्यास खरीप पिकाला पाणी द्यावे लागते. मक्याची काढणी दाणे, वैरण आणि मुरघास या तीन गोष्टींसाठी करतात. सर्वसाधारणपणे मक्याचे पीक पेरणीपासून 80 ते 100 दिवसांत तयार होते. वैरणीसाठी पिकाची कापणी पीक फुलावर येण्याच्या सु ारात केली जाते. मुरघासासाठी कणसातील दाणे नख जाण्याइतपत घट्ट होऊ लागल्यावर पीक कापले जाते. दाण्यांसाठी कणसे कापून घेतल्यावर ताबडतोब झाडे कापून जनावरांना खाऊ घालतात. ज्वारी किंवा बाजरीप्रमाणे मक्याच्या झाडात विषारी अन्नघटक नसतात, त्यामुळे मक्याची वैरण कोणत्याही अवस्थेत कापून जनावरांना खाऊ घालता येते. हिवाळी व उन्हाळी पिकाचे उत्पादन पावसाळी पिकापेक्षा जास्त असते. कारण पावसाळी पिकाला रोग व किडींचा जास्त प्रादूर्भात होतो. साधारणपणे मक्याचे 85% पीक खरीप हंगामात व काही ठिकाणी उन्हाळी हंगामात घेतले जाते. या पिकाच्या रब्बी हंगामातील लागवडीचा विशेष अभ्यास केला जात आहे. महाराष्ट्राच्या काही भागात रब्बी पीक जास्त फायदेशीर होऊ शकेल, असे आढळून आले आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने ‘आफि‘कन टॉल’ हा लुसलुशीत वैरणीचा र?कार शोधून काढला आहे. 60 ते 70 दिवसांत वैरणीचे पीक तयार होते. हेक्टरी 60 ते 70 क्विंटल हिरव्या वैरणीचे उत्पन्न मिळते. भारतातील मक्याच्या दाण्यात जलांश 14.9%,प‘थिने 11.1%,स्निग्ध पदार्थ 3.6%, कार्बोहायड्रेट 66.2%, तंतू 2.7% आणि खनिज पदार्थ 1.4% असतात. मका हिरवा चारा म्हणून जनावरांना देतात. याची ताटे गुरांना उत्कृष्ट आहार आहे. शिवाय मक्याचा मुरघास चांगला होतो. गुरेढोरे, कोंबड्या आणि सर्व पाळीव प्राण्यांसाठी मका हा उत्कृष्ट आहार आहे. चार्‍याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मक्याबरोबर चवळी लावता येते. मक्याचा उपयोग जनावरांचे खाद्य व हिरवा चारा या स्वरूपात मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात 80 ते 90 % मक्याचे उत्पादन मनुष्याच्या अन्नासाठी केले जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात व युरोपातील अनेक देशांत मक्याची लागवड बहुतांशी मांसोत्पादक जनावरे, दुभती जनावरे, घोडे, कोंबड्या यांचे खाद्य म्हणून केली जाते.

नाचणी, नागली

 

नाचणीचे पीक साधारणपणे अतिवृष्टीच्या प्रदेशात घेतले जात असले तरी कमी पावसाच्या प्रदेशात नाचणी लावता येईल. आफि‘केत कमी पाऊस पडणार्‍या प्रदेशात बर्‍याच वेळा मका व ज्वारीबरोबर नाचणी पेरतात. पाऊस नेहमीप्रमाणे वेळेवर पडला नाही तर निदान नाचणीचे पीक तरी मिळू शकते. पाऊस थोडा थोडा पण जास्त काळ पडत राहिला तर 130 मि.मी. पावसावर पीक येऊ शकते. 970 मि.मी.पाऊस असल्यास पीक चांगले येते. सुरुवातीच्या काळात अवर्षण पडले तरी पीक ते सहन करते. पाऊस पडल्यानंतर पिकाची वाढ जोाने होते. रत्नागिरी व नाशिक जिल्ह्यात नाचणी मु‘यत: लावली जाते. भाताप्रमाणे रोपे तयार करून लावणी करतात. पीक दगडगोट्यांच्या जमिनीवर लावता येते पण सुपीक जमिनीवर जेव्हा पीक घेतले जाते तेव्हा भरपूर उत्पन्न येते. पिकाची वाढ 4 ते 5 महिन्यांत पूर्ण होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी करतात. नाचणीवर कीड क्वचित पडते, पण कणसे कोवळी असताना पक्षी नाश करू शकतात. बी लहान असते, ते लवकर वाळते. त्यामुळे हे धान्य कीटकनाशके न वापरता दीर्घकाळ साठवता येते. याला दुष्काळी पीक म्हणतात. केनिया, टांझानियात नव्याने तयार केलेल्या शेतजमिनीवर हे पीक प्रथम लावतात. ओला चारा गुरांना खायला देतात. वैरणीचे बारीक तुकडे भुसाबरोबर जनावरांना देतात. नाचणीचा मुरघास करता येतो.

राळा

 

राळ्याच्या पिकाला 500 ते 750 मि.मी. पाऊस लागतो. ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाऊस याला लागतो. पण पाऊस वेळेवर पडणे आवश्यक असते. हे पीक अवर्षणाचा प्रतिकार बर्‍यापैकी करते. हे लवकर पक्व होत असल्यामुळे अवर्षण टाळते. प्रती हेक्टरी 5 ते 7 कि.बी लागते. रोपे जोाने

वाढतात. 56 ते 62 दिवसांत फुले येतात. नाचणी व कापसाबरोबर राळ्याची लागवड करता येते.

या पिकापासून 15-20 टन हिरवा चारा व 3 ते 5 टन वैरण प्रती हेक्टरी मिळते. फुले येण्याच्या सुारास गवत कापले असता चांगली वैरण व मुरघास करता येतो. गवत  अतिशय चवदार असते, पण हे घोड्यांना खाण्यायोग्य नाही. राळा हे तृणधान्य अतिशय प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. युरोपमध्ये 85% धान्य म्हणून व 6% कोंबड्यांना खाण्यासाठी पीक लावले जाते. अमेरिकेत मु‘यत: वैरणीसाठी पीक घेतले जाते. गुजरातमध्ये राळ्याचे पीक चार्‍यासाठी लावले जाते. हे झपाट्याने वाढते आणि जनावरांना पचेल, आवडेल असा चारा यापासून मिळतो. या पिकाला हलकी, कोरडी जमीन चालते, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात राळा येतो.

वरी

 

फार प्राचीन काळपासून तृणधान्य म्हणून वरीची लागवड केली जाते. हे पीक 500 ते 750 मि.मी.पावसाच्या प्रदेशात लावले जाते. वाळूमिश्रित गाळावर पीक चांगले येते. पुष्कळ प्रकारच्या जमिनीवर वरी वाढू शकते पण भारी चिकण जमिनीवर वाढण्यास अडचण येते. हे पीक मातीत सोडियम कार्बोनेटचे क्षार काही प्रमाणात सहन करते. बी फोकून लावले तर चालते पण बहुधा नांगराने पेरणी करतात. हेक्टरी 10 ते 11 किलो बियाणे लागते. फुले 68 दिवसांत येतात व पीक 90 ते 100 दिवसांत पक्व होते. वरी बहुधा धान्यासाठी पेरली जाते. पण चार्‍यासाठी चवळीबरोबर लावता येईल. रशियामध्ये लसूणघास प्रस्थापित व्हावा म्हणून त्याच्यामधून वरी लावतात. कोणत्याही तृणधान्यापेक्षा वरीला कमी पाणी लागते. कोंबड्या व इतर पक्ष्यांसाठी हे धान्य म्हणून लावले जाते. गुजरातमध्ये गुरांना खाण्यासाठी वरी लावली जाते. उन्हाळ्यात विहिरीच्या किंवा पाटाच्या पाण्यावर पीक चांगले येते. यावेळी हिरव्या चार्‍याची चणचण भासते. त्यावेळी उत्कृष्ट चारा या पिकापासून मिळतो.

वाटी, बारती

 

हे वर्षायू गवत पावसाळ्यात लावून ऑगस्टमध्ये कापतात. याचा चारा दुभत्या जनावरांसाठी उत्तम असतो. याचा मुरघास करता येतो. गुजरातेत पंचमहाल, अहमदाबाद व धुळे जिल्ह्यांत हे तृणधान्य पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

सावा

 

या गवताची उंची 30 ते 90 सें.मी. असते. जमिनीतून याची पुष्कळ खोडे निघतात. पाने गुळगुळीत असतात. याची लागवड पावसाळ्यात हलक्या तांबड्या मातीत करतात. कोकणात डोंगरउतारावरील जमिनीवर आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत घाटावर हे तृणधान्य लावतात. गुजरातमध्ये चार्‍यासाठी उन्हाळ्यात लावतात. फार प्राचीन काळापासून हे तृणधान्य लागवडीत आहे. धान्य, ओली वैरण, मुरघास तिन्हीसाठी याचा उपयाग होतो.

गिनी गवत

 

हे बहुवर्षायू गवत मूळचे उष्णकटिबंधीय आफि‘केतील आहे. भारतात सन 1800 च्या सुारास याची प‘थम लागवड करण्यात आली. जगातील बर्‍याच उष्णकटिबंधीय देशात याची लागवड केली जाते. वेस्ट इंडिजमध्ये या गवताची बरीच लागवड आहे. गिनी गवत 60 ते 200 सें.मी.पर्यंत उंच असते. 780 ते 1797 मि.मी. पावसाच्या प्रदेशात हे गवत वाढू शकते. हे बर्‍याच प्रकारच्या जमिनींवर वाढू शकते. परंतु हलक्या नापीक जमिनीवर गवताची वाढ हळू होते. पाण्याचा निचरा चांगला असल्यास आम्लयुक्त जमीन चालते. क्षार असलेली जमीन गवताला चालत नाही. याची मुळे जमिनीत खोल जातात. त्यामुळे गिनी गवत अवर्षणाचा प्रतिकार चांगल्या प्रकारे करते. दीर्घकाळ पाऊस पडला नाही, कडक अवर्षण पडले तर हे मातीत सुप्तावस्थेत राहते आणि पाऊस आल्यावर त्याची नव्या जोाने पुन्हा फूट होते. गिनी गवताची लागवड करण्याअगोदर जमीन नांगरून तिची योग्य मशागत करणे आवश्यक असते. बी लावून किंवा गवताचे ठोंब लावून लागवड करतात. बी ओळीत पेरतात. बी 1.5 सें.मी.पेक्षा खोल पेरीत नाहीत. हेक्टरी 3-6 कि. बी लागते. एका किलोत 1750000 ते 1030000 बिया असतात. गवताचे ठोंब लावून लागवड करणे जास्त चांगले. हवामान ढगाळ असेल, पावसाची सर येण्याचा संभव असेल अशा दिवशी सरींवर 2’ु 2’ अंतरावर ठोंब लावतात. पाणी देणे शक्य असल्यास देतात. त्यामुळे गवत जास्त वेळा कापता येते. पण पाणी नियमित देण्याची आवश्यकता नाही. लावण्याअगोदर व नंतरही सेंद्रीय खत देणे जरुरीचे आहे. मुळाचे फाटे लावण्याऐवजी गवताची रोपे तयार करून त्यांची पुनर्लागण करता येते. एका हेक्टरवर तयार केलेली रोपे पाच हेक्टर क्षेत्रावर लावण्यास पुरेशी होतात. गिनी गवताबरोबर स्टायलो (डींूश्रेीरपींहशी र्सीळरपशपीळी) लावल्यास मिश्र पीक चांगले येते. याशिवाय गिनी गवताबरोबर चवळी, लसूणघास, बरसीम या शिंबीवर्गीय वनस्पती चार्‍यासाठी लावता येतात.

कुरणात गवत चांगले प्रस्थापित झाल्याशिवाय गुरांना चरू देऊ नये. पावसाळ्यानंतर गवताला बी धरते. बी पडेपर्यंत नवीन कुरणात गुरांना चरू देऊ नये. तसेच 35 सें.मी. गवताची उंची राहीपर्यंतच चरू द्यावे. त्यानुसार किती दिवस किती गुरांना चरू द्यायचे हे ठरवावे. पाळीपाळीने चरू देणे व काही काळ कुरण बंद करणे. असे केले तर गवताच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते. जमिनीत खूप ओल असताना गुरांना चरू देऊ नये. गुरंानी तुडवल्याने गवताचे नुकसान होऊन दलदल होईल. गवत कापून गुरांना गोठ्यात हिरवा चारा देता येतो. नियमित नांगरणी, वखरणी करून माती भुसभुशीत ठेवली आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा शेणखत, कंपोस्ट घातले तर दर 3-4 आठवड्यांनी वर्षभर कापणी करता येते. साधारणपणे वर्षाला एकरी 40 टन हिरवा चारा मिळतो. परंतु सुपीक जमिनीवर उत्पन्न दुपटीने येऊ शकते. गिनी गवत हिरवा चारा, वैरण व मुरघास तिन्हीसाठी उपयोगी आहे. गवत अतिशय रुचकर असून गुरांना ते मानवते व त्यांचे वजन वाढते. दुभत्या गायी म्हशींना आणि शेतीचे काम करणार्‍या बैलांना व घोड्यांना याचा चारा खायला देतात. दुसर्‍या वर्षीच्या शेवटी, वारंवार कापण केल्यामुळे गवताची मोठी बेटे होतात. त्यासाठी एकतर गवताची लागवड दुसरीकडे पुन्हा करावी, नाहीतर कुदळ किंवा फावड्याने प्रत्येक बेटाला उभा व आडवा असे काटकोनात दोन छेद द्यावेत. त्यामुळे बेटाचे चार भाग होतील. त्यातील तीन भाग उपटून काढून टाकावेत. एक जागीच राहू द्यावा. गिनी गवत माफक सावलीत चांगले वाढत असल्याने याची लागवड फळझाडांच्या बागेतून करता येईल. आंब्याच्या झाडांच्यामधूनही गिनी गवत चांगले वाढते. शेतजमिनीवर चार्‍यासाठी याची मुद्दाम लागवड करणे फायदेशीर ठरेल. शेतातील पाण्याच्या चार्‍यांच्या कडेने लावल्यास रोज हिरवा चारा थोड्याफार प्रमाणात मिळत राहील.

र्होडस गवत

 

1915 मध्ये दक्षिण आफि‘केतून भारतात या बहुवर्षायू गवताची आयात करण्यात आली. याचे खोड तारेसारखे असून 90 ते 120 सें.मी.उंची वाढते. खोडाच्या जमिनीत आडव्या वाढणार्‍या शाखा लांब,मजबूत व पर्णयुक्त असतात. पाने 3.5 मि.मी. रुंद व टोकाकडे निमूळती असतात. चकण भारी जमीन सोडून इतर कोणत्याही जमिनीवर हे गवत वाढते. भारी चिकण माती व दलदल या गवताला सोसत नाही. ऊबदार,दमट हवामानात व खोलगट भागात याची वाढ चांगली होते. जमिनीतील पुष्कळ लवणता हे सहन करू शकते. हे गवत अवर्षणाचा चांगला प्रतिकार करते आणि थंडीही सहन करू शकते. भारतात बागायती व जिरायती अशा दोन्ही स्वरूपांत या गवताची लागवड करता येते. र्‍होडस गवताची लागवड बियांपासून किंवा मुळे फुटलेल्या कांड्यांपासून करतात. जिरायती पिकासाठी हेक्टरी 4.5 ते 8 किलो व बागायतीसाठी 11-13 किलो बी लागते. एका किलोत 7250000 ते 9500000 बिया असतात. बी 2 सेंटिमीटरपेक्षा खोल लावत नाहीत. पृष्ठभागावर बिया फेकून त्यावर माती पसरतात किंवा आच्छादनाचा वापर करतात. एका हेक्टरला मुळे फुटलेली कांडे सुारे 25,000 लागतात. पेरणीपूर्वी 12 ते 20 टन शेणखत हेक्टरी देतात. बी पेरून तयार केलेल्या पिकाची तीन महिन्यानंतर आणि कांडे लावून तयार केलेल्या पिकाची दोन महिन्यांनंतर पहिली कापणी करतात. पुढील कापण्या एक महिन्याच्या अंतराने करतात. उत्तर भारतात दरवर्षी 7-8 कापण्या व दक्षिण भारतात उबदार हवामानामुळे 12 कापण्या मिळतात. पेरणीनंतर किंवा लागणीनंतर कोळपणी करणे आवश्यक असते. जरुरी असेल तर विरळणी करून दोन ठोंबांतील अंतर 45 ते 60 सें.मी. ठेवतात. हंगामाप्रमाणे पिकाला 2-3 आठवड्यांच्या अंतराने पाणी देतात. बागायती पिकाचे ओल्या चार्‍याचे वार्षिक हेक्टरी उत्पादन सुारे 37 टन आणि जिरायती पिकाचे सुारे 17.5 टन असते. हे गवत फार झपाट्याने वाढत असल्यामुळे ते शेतात फार दाट होते. यासाठी वर्षातून एकदा नांगरणी करून झाडांची सं‘या मर्यादित ठेवणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे हे गवत एका जागी तीन वर्षे चांगले उत्पादन देते. गवत एक दा प्रस्थापित झाले की गुरांना चरू देऊन फुले येऊ देण्याचे टाळावे. फुले आल्यावर 23 ते 25 दिवसांनी बी पक्व होते. बी काळजीपूर्वक साठवल्यास दोन वर्षे चांगले राहते. झांबियामध्ये र्‍होडस् गवत स्टायलोबरोबर लावले असता 20% ने वाढले. टेक्सासमध्ये पाणी भरून प्रति हेक्टरी वर्षाला

15,775 कि. वैरण मिळाली. पूर्व आफि‘का, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांतून अल्पमुदतीच्या कुरणात हे गवत लावले जाते. याने मातीचा पोत सुधारतो व सेंद्रीय द्रव्ये वाढतात. दक्षिण आफि‘केत या गवताचा चारा दुभत्या जनावरांसाठी चांगला समजला जातो. कुरणात सप्टेंबरपर्यंत या गवतात गुरे चारून व त्यानंतर गुरे चरण्याचे बंद करून गवत फुलावर येण्यापूर्वी कापणी केल्यास त्यापासून वाळलेले गवत तयार करता येते. गुरे चरताना त्यांच्या पायाखाली ते तुडवले गेले तरी त्याला त्यापासून अपाय होत नाही. र्‍होडस् गवताबरोबर चवळी, मोहरी, गवार ही चार्‍याची पिके लावता येतात. लसूणघासाबरोबर हे पीक घेतल्यास चार्‍याची उपयुक्तता वाढते आणि चार्‍याचा वर्षभर पुरवठा होतो. उन्हाळ्यात या गवतापासून आणि हिवाळ्यात लसूणघासापासून हिरवा चारा मिळतो. र्‍होडस् गवत पालेदार असल्याने जनावरे आवडीने खातात. हे पौष्टिक व मोलाचे चार्‍याचे पीक आहे. हिरव्या चार्‍यात 3% आणि फुलावर येण्यापूर्वी कापणी करून वाळवलेल्या गवतात 6.4 % प्रथिने असतात. तसेच या पिकास कॅल्शिअम (.5%) व फॉस्फरस (0.4%) समतोल प्रमाणात असतात. घोड्यांसाठी हे गवत योग्य समजत नाहीत. महाराष्ट्रात र्‍होडस् गवताची फारशी लागवड नाही. पण हे फार पौष्टिक व उत्कृष्ट गवत असल्याने शेतजमिनीवर याची लागवड करता येईल.

पॅरागस,

 

हे बहुवर्षायू गवत मूळचे बझिलच्या पॅरा प्रांतातील असल्यामुळे त्याला पॅरा गवत म्हणतात. हे दिसावयास भरभरीत असून जमिनीवर वाढणार्‍या धावर्‍या खोडापासून याची वाढ झपाट्याने होते. खोडावरील पेरांपासून मुळे व 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीची सरळ वाढणारी खोडे निघतात. गवत चरबट असले तरी गोड व पौष्टिक आहे. गुरे हे गवत फार आवडीने खातात. दमट उष्ण हवामानात पाणथळ जागी पॅरा गवत चांगले वाढते, 1894 मध्ये श्रीलंकेमधून हे भारतात प्रथम आणले गेले. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकामधील खोलगट, पाणथळ जागी याची लागवड वाढत आहे. खोलगट भागातील सुपीक जमीन या पिकाला चांगली मानवते. क्षारामुळे अगर दलदल झाल्यामुळे इतर पिकास निरुपयोगी बनलेल्या जमिनीत हे पीक चांगले येते. 4-5 वर्षे हे पीक

घेतल्यानंतर जमीन सुधारून इतर पिके घेण्यालायक बनते. फे ब‘ुवारी-मार्चध्ये जमीन नांगरून,कुळवून हेक्टरी 35 ते 45 टन शेणखत घालून तयार करतात. तिच्यामध्ये मे-जूनमध्ये 3-4 डोळे असलेल्या,25-30 सेंटिमीटर लांबीच्या खोडाच्या कांड्या 1 ु 1 मीटर अंतरावर ओळीत जमिनीत खोचून लावतात. हेक्टरी 10-12 हजार कांड्या लागतात. दलदलीच्या जमिनीत मशागत न करताच लागण करतात. जमिनीत लावलेल्या प्रत्येक पेरापासून मुळ्या फुटून गवत वाढीस लागते. कांड्या लावल्याबरोबर पाणी देतात. 100 सें.मी. किंवा त्याहून अधिक पर्जन्यमान असलेल्या भागात गवत चांगले वाढते. पण पाऊस नसेल तेव्हा 5-6 दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे लागते. बी लावून लागवड करता येते. 1 से.मी.पेक्षा खोल बी लावू नये. हे गवत पसरून जमीन झाकून टाकते. त्यामुळे त्याच्यात तण वाढत नाही. पाणी दिल्याने जमीन कडक झाल्यास पिकाच्या दोन ओळींमधील जमीन हलक्या नांगराने फोडून मोकळी केल्यास गवताची वाढ चांगली होते. एकदा लागण केलेले पीक 7-8 वर्षे ठेवतात, लागवडीपासून साधारणपणे अडीच-तीन महिन्यात गवत 1-1। मीटर उंच झाल्यावर पहिली कापणी करतात. पुढे महिन्याने एक याप्रमाणे कापणी करतात. गवत कोवळे असतानाच कापावे लागते. मुंबईजवळील आरेगवळीवाड्यात सुारे 200 हेक्टरवर दलदलीच्या जमिनीत हे पीक घेतले आहे. तेथील 16-17 हजार दुभत्या जनावरांचे गोठे धुतलेले पाणी या क्षेत्रात सोडले जाते. त्यामुळे हेक्टरी 250 टनांपर्यंत हिरवे गवत वर्षाला मिळते. पुरेसे खत व जमिनीत ओल असल्याने उन्हाळ्यापर्यंत गवत

हिरवे राहते व गुरांना तेव्हा हिरवा चारा मिळतो. पॅरा गवताबरोबर लसूणघास, बरसीम, चवळी ह्या शिंबीवर्गीय चार्‍याच्या वनस्पती लावता येतात. एका हेक्टरमधून 20 ते 25 किलो बी मिळते. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीवर हेक्टरी तीन किंवा अधिक गुरे चारता येतात. पाणी दिल्याने वर्षाला हेक्टरी 98 टनांच्या आसपास हिरवा चारा साधारणपणे मिळतो. कीटकांचा व रोगांचा उपद्रव या पिकाला होत नाही. वाढीच्या कोणत्याही अवस्थेत पॅरागवत जनावरे आवडीने खातात. महाराष्ट्रात बर्‍याच जागी दलदलीचे व दमट हवामानाचे क्षेत्र आहे. तेथे हे गवत लावल्यास पौष्टिक हिरवी वैरण गुराढोरांना मिळेल व नापीक जमीन उपयोगात आणता येईल.

नेपियर गवत

 

50’’ ते 100’’ पर्जन्यमान असलेल्या भागात पडीक व हलक्या जमिनीवर हे गवत लावता येईल. हे अतिवृष्टीच्या प्रदेशातील गवत असले तरी अर्धरुक्ष प्रदेशात लावले जाते. हे बहुवर्षायू गवत पाणी देण्याची सोय असल्यास वर्षभर कधीही लावता येते. गवत कोवळे असताना गुरे आवडीने खातात. एकदा लावल्यावर तीन वर्षांपर्यंत गवताची कापणी करता येते. नेपियर बाजरी हायब‘ीड ओलिताची सोय असलेल्या शेतजमिनीवर लावण्यास चांगले आहे. या गवतापासून हिरव्या चार्‍याचे भरघोस उत्पन्न मिळते. फक्त नेपिअर बाजरी हायब‘ीड लावायचे असेल तर हेक्टरी 400,000 ठोंब 50ु 50 सें.मी.अंतरावर लावतात. पण बरोबर शिंबीवर्गीय चार्‍याच्या वनस्पती लावायच्या असतील 20,000 ठोंब 100ु 50 सें.मी. अंतरावर लावतात. पावसाळा सोडून इतर वेळी 15 दिवसांच्या अंतराने पाणी देतात. लावल्यावर 75 दिवसांनी पहिली कापणी करतात. त्यानंतर 45 दिवसांच्या अंतराने वर्षांत 8 ते 10 कापण्या करतात. फक्त गवत लावले तर हेक्टरी 1500 ते 1800 क्विंटल व मिश्र पिकापासून 1800 ते 2800 क्विंटल हिरवा चारा मिळतो. नेपियर बाजरी हायब‘ीडबरोबर चवळी व मोहरी किंवा लसूणघास व मोहरी किंवा मका व चवळी किंवा बरसीम व चवळी लावता येते.

दीनानाथ

 

दीनानाथ गवत हे उष्णकटिबंधीय उत्तर आफि‘केत व भारतात आढळते. हे 1 मीटरपर्यंत उंच वाढते. याला बुंध्यापासून व वर फांद्या फुटतात. पाने 15 ते 25 सें.मी. लांब आणि 4 ते 10 मि.मी. रुंद असतात. हे बिहारमध्ये 127 मि.मी.पावसावर जून ते सप्टेंबरपर्यंत वाढते. परंतु सामान्यत: 500 ते 600 मि.मी.पावसाच्या प्रदेशात हे गवत येते. अवर्षणाला हे चांगले तोेंड देते. उत्तर नायजेरियात कोरड्या उन्हाळ्यात 7 महिन्यांपर्यंत टिकून राहते. सुपीक गाळाच्या जमिनीवर दीनानाथ गवताची उत्तम वाढ होते. पण खते घालून रेताड जमिनीवर लावता येते. आम्ल व अल्कधर्मी दोन्ही र?कारच्या जमिनींवर हे गवत वाढू शकते. नांगरलेल्या, ओलसर जमिनीवर 8 ते 9 कि.ग‘ॅ. बी जून-जुलैध्ये 50ु 30 सें.मी. किंवा 60ु 40 सें.मी.अंतरावर पेरतात. त्या अगोदर 10 टन काडीकचरा जमिनीत गाडतात. उगवून आल्यावर पावसाळ्यात दोनदा तण काढतात. हे गवत नत्रयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देते. लावल्यानंतर 90 दिवसांनी पहिली कापणी करतात. त्यानंतर 60 दिवसांनी दुसरी कापणी करतात. दोन कापण्यांपासून हेक्टरी 750 ते 1000 क्विंटल हिरवा चारा मिळतो. हिरवा चारा कापून गोठ्यात गुरांना दिला जातो. बिहारमध्ये दीनानाथ गवत हे सर्वात लवकर होणारे गवत आहे. पंजाब विद्यापीठ, हिसार येथून या गवताच्या चार प्रजाती प्रसारित केल्या आहेत. जनावरे गवत आवडीने खातात. यात विषारी घटक नसतात. याचा मुरघास करता येतो. कुरणामध्ये हे गवत लावण्यास चांगले आहे. शेळ्या, मेंढ्या, आणि गुरा-ढोरांना चरण्यास चांगले आहे. याच्यावर रोग किंवा कीड पडत नाही. या गवताच्या वैरणीत 55 ते 77% पचू शकतील अशी अन्नद्रव्ये असतात. या गवताबरोबर चवळी, गवार, मूग, वाल यांसार‘या शिंबीवर्गीय वनस्पती चार्‍यासाठी लावता येतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी हे गवत उपयुक्त आहे. हे वर्षायू गवत चार्‍यासाठी शेतजमिनीवर लावता येईल.

मकचारी

 

हे उंच, जोाने वाढणारे, लुसलुशीत, वर्षायू गवत मूळचे मेक्सिको, ग्वारेाला या देशांधील आहे. हे गवत बरेचसे मक्यासारखे दिसते. हे साधारणपणे 6 ते 8 फूट उंच वाढते. परंतु अनुकूल परिस्थितीत याची उंची 10 ते 12 फूट किंवा त्याहून अधिक होते. याचे दाणे लांबट, मोठे असतात. याच्यापासून चार्‍याचे उत्पादन भरपूर प्रमाणात मिळते. मद‘ासमध्ये पाणी भरून वाढवलेल्या पिकापासून एका कापणीत एकरी 20 टन हिरवा चारा मिळाला तर वर्षात 3-4 कापण्यांपासून एकरी 60 ते 80 टन हिरवा चारा मिळाला. गुराढोरांना व घोड्यांना हा चारा आवडतो. याचा मुरघास चांगला होतो. गवताचे बी एप्रिल ते जुलैपर्यंत पेरता येते. हेक्टरी 30 ते 40 किलाग‘ॅ बी 40-45 सें.मी. अंतरावर पेरतात. उन्हाळी पिकाला 2 ते 3 वेळा पाणी देतात. खरिपामध्ये पावसाच्या पाण्यावर पीक येते. 60 ते 70 दिवसांच्या 1 ते 2 कापण्या करता येतात. एका कापणीपासून हेक्टरी 300 ते 450 क्विंटल आणि दोन कापण्यांपासून 450 ते 600 क्विंटल हिरवा चारा मिळतो.

ओट

 

ओटचे लागवडीचे बरेच प्रकार आहेत. याचे खोड 2 ते 3 हात उंच होते. याला थंड, ओलसर हवा आणि मध्यम प्रकारची जमीन मानवते. पुणे, अहमदनगर, सातारा, अहमदाबाद जिल्ह्यांध्ये ओटचे रब्बी पीक घेतात. पशूंना हे गवत आवडते व मानवते. कांडाची वैरण उत्तम होते. ओटमध्ये 67 %कर्बोदके , 16 % प्रथिने, 6 % स्निग्ध पदार्थ, 2 % क्षार व 7 % पाणी असते. यात लोह कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, जस्त वगैरे सर्व आवश्यक खनिजे असून बी, डी, इ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यातील तंतूुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते व पचनसंस्थेचे कार्य चांगले चालते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत हेक्टरी 80 ते 90 कि. गॅ‘ बी 20 ते 25 सें.मी. अंतरावर पेरतात. पाण्याच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्या लागतात. फक्त एकदा कापणी करायची असेल तर गवताला 50 टक्के फुले आल्यावर करतात. दोन कापण्या करायच्या असतील तर पहिली कापणी 60 दिवसांनी करून दुसरी कापणी 50 टक्के फुले आल्यावर करतात. तीन कापण्या करावयाच्या असतील तर पहिली कापणी 55 दिवसांनी, दुसरी कापणी 105 दिवसांनी व तिसरी कापणी 50 टक्के फुले आल्यावर करतात. फक्त एक कापणी केली असता हेक्टरी 300 ते 450 क्विंटल हिरवा चारा मिळतो. दोन कापण्यांपासून हेक्टरी 400 ते 550 क्विंटल व तीन कापण्यांपासून 400 ते 575 क्विंटल हिरवा चारा मिळतो.

 

माहिती लेखन : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate