कोरडवाहू क्षेत्रात अनियमित पडणारया पावसाच्या पाण्याला अडवून तिथेच मुरावण्यासाठी वेगवेगळी कामे करावी लागतात.जेवढा जमिनीत ओलावा साठवता येईल तेवढी शेती उत्पादनाची शाश्वती अधिक असते.किंबहुना जमिनितल्या ओलाव्यावरच कोरडवाहू भागातला शेती व्यवसाय अवलंबून असतो.पावसाचे पडणारे पाणी मुरावण्यासाठी मूलस्थानी जलसंधारनाच्या पद्धती फार उपयुक्त आहेत.कारण त्यामुळे पाण्याचे बाष्पिभवन होत नाही.पाणी जमिनीच्या पोटात साठावल्यामुळे पिकांना सहजपणे उपलब्ध होते.कोणतेही यांत्रिक बांधकाम करावे लागत नाही.पाणी पिकांच्या ठिकाणी वाहून आणावे लागत नाही.त्यामुळे मुळस्थानी जलसंधारानाची कामे जमिनितल्या ओलाव्यासाठी फारच उपयुक्त आणि परिणामकारक आहेत.शिवाराताले पाणी शिवारातच मुरवण्याच्या कृतिक आणि कृषक अशा दोन पद्धति आहेत.याशिवाय जास्तीच्या वाहनार्या पाण्याला अडवण्यासाठी कृतिक बांधकाम पद्धत अवलंबावी लागते.
अशा आळे पद्धतीत झाडाच्या बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केले तर हाच ओलावा जास्त काळ टिकून राहतो.तय ओलाव्याचा फायदा फळझाडांना चांगलाच होतो.
कृषक पद्धतीमध्ये उताराला आडवी नांगरट, कुळवाच्या पाळ्या पेरणी, आंतरमशागतिची कामे करावीत.या मशागतीमुळेपाणी अड़विले जाते आणि मुरविले जाते.त्यामुळे जास्तीत जास्त ओलावा साठवला जातो.तो जास्त काळ टिकतो.
नांगरट उताराला आडवी केल्यास उन्हाळ्यातल्या वादळी पावसाचे पाणी अडवून जिरवले जाते, तसेच इतर मशागतीमुळे पावसाचे पाणी वाहून न जाता अडवून मुरवले जाते.
कोळपनी ही आंतरमशागत उभ्या पिकात असणारा ओलावा जास्त काळ पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगी पडते.
दुबार पिक पद्धतीचा अवलंब केल्यास खरिपातल्या आणि रब्बीतल्या पिकंचं जमिनीवर आच्छादन होते.त्यामुळे जमिनितल्या ओलाव्याचे बाष्पीभवन होत नाही.जमिनीची धुप होत नाही.
आंतरपिक म्हणजे एकाच हंगामात त्याच जमिनीत पट्टा पद्धतीने उताराला आडवी दोन पिके पेरली, तर पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पाणी त्या ठिकाणी मुरते.शिवाय आच्छादन झाल्यामुळे बाष्पीभवन होत नाही.ओलावा टिकून राहतो.जास्तीचा साठविला जातो.
पट्टा पद्धतीत भुईमुग, मटकी, हुलगा, सोयाबीन, यांसारख्या धुप प्रतिबंधक पिकाची उताराला आडवी पेरणी करुन पिक घेतली असता, पडणार्या पावसाची तीव्रता कमी केलीजाते. पट्ट्यामुळे पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण केला जातो.बाष्पीभवन रोखले जाते.त्यामुळे ओलावा पट्टा पद्धतीत जास्तीचा साठवून जास्त दिवस टिकवला जातो.
आच्छादन ही पद्धत ओलावा जास्त काळ साठवून सर्वात परिणामकारक पद्धत आहे.पिकाच्या दोन ओळीत वेगवेगळी सेंद्रिय मटेरियल, काडीकचरा, पालापाचोळा उष्टावळ कार्बारील पावडरचा थोडासा वापर करून पद्धतशीरपणे आच्छादन केल्यास पिकाला दोन पाणी देण्याइतका ओलावा मिळतो आणि तो जास्त काळ पिकांना उपलब्ध होतो.
जैविक बांध म्हणजे झुडुवजा वनस्पतींची उताराला एका रेषेत आडवी बांधासारखी लागन केली तर वाहून जाणार्या पाण्याला अड़थळा निर्माण होतो.पाणी तिथेच मुरते.धुप कमी होते.मारवेल, पवना, सुबाभुळ इ. चा वापर जैविक बांधासाठी करावा.या जैविक बांधामुळे जनावरांना चाराही मिळतो.ओलावा टिकावण्यासाठी जैविक बांध फायद्याचे ठरतात.
या मूलस्थानी जलसंधारणाच्या भौतिक आणि कृषक उपचाराबरोबरच जास्तीचे पाणी साठवून मुरण्यासाठी काही अभियांत्रिकी माती-पाणी संवर्धनाची कामे करावी लागतात.त्यामध्ये समपातळीत बांध उताराला आडवे घातल्यास पाणी अडविले जाते, साठवीले जाते.या बांधामुळे जमिनीत ३० ते ४० टक्के ओलावा जास्तीचा साठवीला जातो.पोटातील जादा पाणी ढाळीच्या बांधाकडून मुख्य चारीला पोचवले जाते.पाण्याचा वेग कमी होऊन बाहेर काढले जाते.जमीनी चिबडयुक्त होण्याचा धोका कमी होतो.
शोषखड्डे काढून पाणी साठवून जास्तीचा ओलावा साठवट येतो.सलग समपातळीत चर काढल्यामुळे उताराचे पाणी अडविले जाते.भरव्यावर लावलेली झाडे जोमाने वाढतात.शेततळी, सीमेंट नालाबांध यामुळेही ओढयावरचे पाणी अडविले जाते.त्याचा संरक्षित पाणी म्हणून वापर करता येऊन पिकांना ओलावा उपलब्ध करुन दिला जातो.अशा प्रकारे ओलावा साठवण्यासाठी उपचार करावेत.
संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)
अंतिम सुधारित : 7/15/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...