वातावरणातील वाढत्या कर्बवायूचा परिणाम सागरी पाण्यावर होत आहे. या वाढत्या सामूचा परिणाम सागरी जिवांवरही होत असून, कोळंबीच्या मरतुकीमध्ये व चवीमध्येही घट होत असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.
वातावरणातील बदलांचे पिकावर होणारे परिणाम तपासले जात आहेत, तसेच सागरी जिवांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो.
मात्र आज जागतिक पातळीवर फार मोठी लोकसंख्या आहारासाठी सागरी उत्पादनावर अवलंबून आहे, त्यामुळे वातावरणातील बदलांचा त्यांच्या चवीवरही परिणाम होत असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांसह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.
जागतिक पातळीवर वाढलेल्या कर्बवायूचे शोषण सागरामध्येही होत असते. परिणामी आम्लतेचे प्रमाण वाढत असल्याने कोळंबीच्या संवेदनशील घटकावर परिणाम होतो. त्यांच्या चवीमध्येही बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह...
मध्यप्रदेशातील मांडला जिल्हायातिल आदिवशी आशा असल्य...
कोकणातील आंबा आणि देशावरील ऊस, द्राक्ष, हळद, आले, ...
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक श...