सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील मागील दोन वर्षांचा दुष्काळ लक्षात घेऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे तसेच उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. जमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून आपण ते शेतात एक खडुा करून साचवितो, कार्यक्षम वापराचाच विचार करत होतो, पण आता कमी पर्जन्यमानाच्या काळात आपण पाणी कार्यक्षमतेने साठविणे हे देखील लक्षात घेणे आवश्यक
आहे. त्यासाठीच प्रस्तुत लेखात महत्वाच्या म्हणजेच शेततळ्याचा कार्यक्षम वापर या विषयावर माहिती दिली आहे.
शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालिन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीच्या काठावरील पडीक क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविले जाते व त्याचा उपयोग आपणास संरक्षित सिंचनासाठी करता येतो. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशावेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता येते व त्यामुळे हमखास पीक येते. तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीस जर शेततळ्यात पाणी साठविले असेल तर त्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामात सुरुवातीस जर शेततळ्यात पाणी साठविले असेल तर त्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामात मर्यादित क्षेत्रात एखादे पिक घेता येईल .
तसे पाहिले तर पावसाचे वाहून जाणारे पाणी शेतात आडविण्याच्या शेततळ्याच्या वरच्या बाजूस पाणलोट क्षेत्राची आवश्यकता असते. जेणेकरून वाहून जाणारे पावसाचे पाणी या खोदलेल्या तळ्यात साठविता येईल. पण ब-याच वेळा जेव्हा शेताचे क्षेत्र अल्प किंवा कमी असते अशा वेळी जरी शेतात तळे घेतले तरी आवश्यक तेवढे पाणी त्यामध्ये साठू शकत नाही. परंतू शेतक-यांनी पिके घेतल्यानंतर ती उन्हाळ्यामध्ये जगवायची असतात. त्यांच्याकडे शेतात पाण्याचे स्त्रोत नसते अशावेळी शेतक-यांना इतरत्र ठिकाणाहून पाणी आणून शेतात ते साठविण्याची व्यवस्था करून व साठवणूक तलाव उपयोगी पडतात.
शेततळ्याचे मुख्यत्वे खालीलप्रमाणे तीन प्रकार आहेत.
शेततळ्यामध्ये साधारणत: संरक्षित सिंचनाची गरज भागविण्यासाठी पाणी साठविले जाते. हे पाणी शेततळ्याचे जे पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रावरील जमिनीवर पडणा-या पावसाच्या अपधावामुळे शेतात येते. पावसाच्या पाण्याचा किती अपधाव होईल यावरून तेवढा अपधाव साठविण्याइतपत शेतातळ्याचा आकार असावा.
अपधाव काढणे
अपधाव काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर करावा. या सूत्रानुसार घन मीटरमध्ये एकूण अपधाव दिलेला आहे.
एकूण अपधाव = क *प * अ /१०
क - सरासरी पावसापासून उपलब्ध होणारा अपेक्षित अपधाव (टक्के)
प - वार्षिक सरासरी पर्जन्यमान (मि.मी.)
अ - पाणलोटाचे एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)
वार्षिक सरासरी पावसावर उपलब्ध होणारा अपधाव (क) हा भारी जमिनीत ८ ते १0 टक्के, तांबड्या जमिनीत २0 टक्के आणि मध्यम भारी जमिनीत १0 ते १५ टक्के इतका धरावा. यासाठी एक उदाहरण घेऊ, जर शेतातळ्याचे पाणलोट क्षेत्र ५ हेक्टर असेल म्हणजेच 'अ', वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६00 मि.मी. असेल, म्हणजेच 'प' व जमिनीचा प्रकार मध्यम भारी असेल तर अपेक्षित अपधाव म्हणजेच कफ १0 असेल, तर ५ x ६00 x १0 म्हणजे ३0,000 भागिले १0 म्हणजे ३000 घनमीटर किंवा ३0 लाख लिटरपर्यंत पाणी आपधावाद्वारे शेततळ्यात साठविण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.
शेततळ्याचे आकारमान व पाणी साठवणूकक्षमता शेततळ्याचा आकार पाणलोट क्षेत्रानुसार व त्यातून उपलब्ध होणा-या अपधावेतून होणा-या पाणीसाठ्याचा अनुषंगाने पुढीलप्रमाणे असावा.
पाणी साठवणक्षमता (लिटर) | खोली (मीटर) | माथ्याची लांबी-रुंदी (मी.) | तळाची लांबी-रुंदी (मी.) | बाजूचा उतार |
---|---|---|---|---|
441000 | 3 | 1515 | 99 | १:1 |
351000 | 3 | 1515 | 66 | १:५:1 |
876000 | 3 | 2020 | 1414 | १:1 |
741000 | 3 | 2020 | 1111 | १:५:1 |
1461000 | 3 | 2525 |
1919 | १:1 |
1281000 | 3 | 2525 |
1616 | १:५:1 |
2196000 | 3 | 3030 | 2424 | १:1 |
1972000 | 3 | 3030 | 2121 | १:५:1 |
टीप: शेततळ्यातील पाण्याची खोली ३.0 मीटर एवढी गृहीत धरली आहे.
शेतात ज्या ठिंकाणी शेततळे घेतलेले आहे तेथून ओघळीपर्यंत
साधारण १० मी. लांबीचा व १.५ ते २ मीट्र रुंदीचा इनलेट चर तयार करावा. चराची खोली ०.५० मी. पर्यंत घ्यावी व त्यास भावश्यक पण बॅीन टक्क्यापेक्षा कमी उतार कैफन २० ते २५ सें.मी. जाडीच्या भाकाराचा
दगडाचे भाच्छादन करावे. तसेच भोघळींचे पाणी इनलेटमध्ये घेण्यासाठी ओघळीमध्ये छोटेसे लुजबोल्ड्र स्ट्रक्चर करावे किंवा सिमॅट्च्या मोकळ्या गोण्यांमध्ये वाळू भरुन त्या ओघळीत भाड्या टाकल्यात. शैततळे पाण्याने पूर्ण भरूयानंतर जादा झालेले पाणी ओघळीमध्ये सुरक्षितपणे सोडण्यासाठी भाउठलेट तयार करावे. इनलेट प्रमाणेच 3भाफ़ठलेंटने काम करावें. १.५ c तें २ मी. रुदांचा चर कशवा खोलीं ०.५० मीटर असावी. तळाची श्रुप होऊ नये म्हणून उतार दोन छक्के पेक्षा कमी ठेवून तळास दगडी आच्छादन करावे. तसेच भाऊठ्लेट्मथून बाहेर जाणारे पाणी शेतीसाठी जेव्हा पहिंजे तेव्हा घेण्यासाठी पट करुन घ्यावा. भाऊठलेट्ची लांबी शैततळ्यापासून ओघळीफ्र्यंत साधारणपणे १० मीटर ठेवावी. भाऊठलेटचे खोदकाम करूताना त्याला जर्मनीच्या प्रकारानुसार १.५:१ किंवा २:१ असे बाजू उतार द्यावेत.
ज्या जर्मिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. तसेच पाणी पाश्मरण्याचा वेगही प्रचंड आहे. तेधे पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरूलेले शेततळे काही किंवसांत कोरडे होते. पर्यायाने अशा शेततळ्यातून अपेक्षित फायदा होत नाही शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरासची बेन्टोनाईट, मातीं-मिंट र्मिश्रण, चिंकणमाती किंवा प्लॅस्ठ्कि फिल्मचा वापर करावा.
सिमेंट व मातीचे प्रमाण १:८ व जाडी पाच सें.मी. इतकी ठेवतात. प्लॅस्लिक फिल्म वाफ्स्ताना त्याचीं जाड़ीं ३oc तें ५oo जी.एस.एम. अमावीं यावर उन्हाचा किंवा भर्तिनील किंग्णांचा विंपरीत परिणाम होत नाही. प्लॅस्लिकचे कापड शैततळ्यात पसखताना मुस्माची किंवा मातींची अणकुचिंदार ठोके वर येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. तसे असल्यास सुक्या मातीचे किंवा वाळूचे धर पसरुन त्यावर प्लॅस्ट्किचे कापड घड्या पडणार नाही या पद्धतीने टाकावे. शैततळ्याच्या चारही बाजूंनी माथ्यावर ३० × ३० सॅमी. आकाराचे चर खोदून घ्यावेत. या चरात कापड घालून मातीने चर पाण्याच्या वजनामुळे खाली घसरणार नाही व शैततळ्यातील साठविलेले पाणी जर्मिनीमध्ये मुग्णार नाही. शेततळे तयार केल्यानंतर प्राणी कापड चावून खराब करु शकतात तसेच गाई किंवा म्हशींमृद्धा शैततळ्यात पडू शकतात. हे सर्व टाळण्यासाप्ती शैततळ्याच्या चारही बाजूंनी कुंपण करावे.
शेततळ्यातून बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. तो टाळणे आवश्यक आहे .त्यासाठी खालील पर्यायाचा अवलंब करावा
● पाणीसाठ्यावर प्लॅस्लिक भाच्छादन किंवा पालापाचोळा पसरविंल्यास बाघपीभवन कमी करुता येते.
● उन्हाळ्याच्या तीन ते चार महिंन्यात शैततळ्यातील पाण्याच्या पृष्ठभागावर रासायनेिक संयुगे किंवा प्रतिरोधके क्राविंक कालावधीने हे प्रतिरोधक वापरुतात. उत्पादकाने किंलेल्या माहितीनुसार हे एक फॅट्रीभंसीड संयुग आहे. ते पाण्यावर पसरविंल्याने पिंण्याचे पाणी, मासे केिंवा माणसे याना श्रोंका होत नाहीं. अथां एकर तलवाच्या पृष्ठभागासाती एक किलो इव्हॅलाॅक वापरावे.
● निंबोळी तेल किंवा नेिमतेल या वनस्पतीजन्य तेलाचाही वापर बाष्पीभवन नियंत्रणासप्ती करूता येतो. नैसर्गिक तेल असल्यामुळे हे वाफरण्यास भपायकास्क नाही. साधारणतः ३० ते ३५ चॉस मीटर
पाण्याच्या पृष्ठभागासाठी १ लिटर निंबोळी तेलाची आवश्यकता असते.
● थमोंकॉलच्या वापराने बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवता येते. औद्योगीक वसाहतीच्या भागात थमॉकॉल मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने उपलब्ध होतात. थर्मोकॉलचे तुकडे शेततळ्यात सहजपणे पसरविता येतात व त्याचा वापर जास्त कालावधीसाठी करता येवून त्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
शेततळे घेण्यापूर्वी मृद व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणेकरून पावसाच्या वाहून येणा-या पाण्याबरोबरच गाळ वाहून येणार नाही. शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या ठिकाणी गाळण यंत्रणा बसवावी विशेष करून शेतामध्ये उताराला आडवी किंवा समतल मशागत करावी. ब-याच ठिकाणी शेततळे भरल्यानंतर जास्तीचे पाणी खालच्या तोंडातून मोकळे न वाहता ते शेततळ्याच्या वरच्या बाजूने शेतात मागे पसरलेले दिसते. याचा अर्थ असा, की शेततळ्याचे खालचे तोंड हे वरच्या तोंडापेक्षा उंच ठेवलेले आहे. त्यामुळे शेततळ्यात पाणी आत येणा-या तोंडापेक्षा पाणी बाहेर जाणारे तोंड हे किमान सहा इंच तरी खाली असावे. बाष्परोधकामुळे पाण्यावर अत्यंत पातळ थर तयार होतो व त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी वातावरणात बाष्प किंवा वाफेच्या स्वरूपात जाणे ४0 ते ५0 टक्क्यांनी कमी होते. याचा वापर पावसाळा सोडल्यास २५0 ते ३00 दिवस करणे उपयोगाचे आहे. वा-याचा वेग जेव्हा जास्त असतो तेव्हा मात्र बाष्परोधके तलावाच्या कडेला जमा होतात व त्यामुळे त्याचा प्रभाव पडत नाही.
सपाट जमिनीवरील अर्धे खोदलेल्या व अर्धे बांधलेल्या शेततळ्यामध्ये (हॉफ, डग आउट) पावसाच्या अपवाधाचे, पावसाचे तसेच बाहेरून इतर स्त्रोताद्वारे पाणी साठवून ठेवू शकतो. अशा शेततळ्याच्या पाणीसाठ्यातून वर्षभर साधारणतः किती क्षेत्र भिजविता येऊ शकते याचे एक उदाहरण माहितीसाठी पुढे दिले आहे.
● शेततळ्याचा प्रकार : हॉफ डग आउट
● शेततळ्याचे जमिनीच्या पृष्ठभागावरील मोजमाप : ३o x ३० मी.
● शेततळ्याच्या आतील बाजूचा उतार : १.१
● शेततळ्याची खोली : ५ मीटर (जमिनीच्या पृष्ठभागावर २ मीटर व पृष्ठभागाखाली ३ मीटर)
अ) शेततळ्याची पाणी साठविण्याची एकूण क्षमता
● जमिनीच्या पृष्ठभागाखाली २७ x २७ x ३ = २१८७ घनमीटर
● जमिनीच्या पृष्ठभागावर ३२ x ३२ × २ = २o४८ घनमीटर एकंदर = ४२३५ घनमीटर = ४२३५o00 लीटर
ब) शेततळ्यातून झिरपा व बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय
शेततळ्याचे अस्तरीकरण केलेल्यो तसेच वर्षभराचे सरासरी पाण्याचे
बाष्पीभवन प्रतिदिवस ४ मि.मी. व वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५00 मि.मी.
असे गृहीत धरून शेततळ्यातून एका वर्षात अंदाजे ६,३0,000 लिटर पाण्याचा या प्रक्रियेद्वारे अपव्यय होईल.
क) सिंचनासाठी उपलब्ध पाणी = ४२,३५,000-६,३0,000 लीटर
=३५,०५,००० लिटर
ड) भाजीपाला पिकाची पाण्याची गरज
एक हेक्टर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन पध्दतीद्वारे दर दिवशी सरासरी ३२,000 लिटर पाण्याची गरज भासू शकते. हंगाम, स्थळ, पीक/पिकाचा तसेच पाण्याची सिंचनासाठी गरज ३६५ दिवसांपैकी ३oo दिवस आहे असे गृहीत धरून एका हेक्टरवर वर्षभरात भाजीपाल्याची तीन पिके घेण्याकरिता ९६,oo,ooo लिटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता आहे.
इ) डाळिंब पिकाची पाण्याची गरज
डाळिंब लागवड ४ x ३.५ मीटरवर केली असता दर हेक्टरी ७१५ झाडे बसतात. एका झाडाची सरासरी पाण्याची गरज २५.0 लिटर गृहीत धरून एका हेक्टरला प्रतिदिन सरासरी १७८७५ लिटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता आहे. त्यानुसार ३00 दिवसासाठी ५३,६२,५00 लिटर एवढे पाणी आवश्यक आहे.
फ) एकंदर भिजू शकणारे क्षेत्र वर नमूद केलेल्या शेततळ्याच्या पाणी साठ्यातून वर्षभरात भाजीपाल्याची तीन पिके घेतली असता साधारणत: प्रत्येक हंगामात एक पीक घेतले असता साधारणपणे १.५ एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. वर नमूद केलेली आकडेवारी ही उदाहरणासाठी आहे. प्रत्यक्ष पीक/ घेता या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/27/2020
सारखीच तलावाची मशागत करून मत्स्योत्पादन वाढविणे म्...
सांगली जिल्ह्यातील आटपाडीत पाऊस पडतो तो परतीचाच. म...
गावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वात...
थोडी मेहनत, थोडे नियोजन व थोडे मार्गदर्शन या त्रिस...