सध्या सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी उघडीप दिसत असली तरी हवामानाच्या अंदाजानुसार पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बागेमध्ये आर्द्रता फार वाढलेली आहे. यामुळे बागेत वेगवेगळ्या अडचणी उद्भवत आहेत. त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती या लेखातून घेऊ.
बऱ्याच बागांमध्ये ही परिस्थिती दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर पाऊस झालेल्या बागेमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. परिणामी, रोगांच्या जिवाणूने पानातील रस शोषून घेतल्याने पाने अशक्त झाली. पानांची देठांशी असलेली मजबुती कमी होऊन आता बागेत अवेळी पानगळ दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांतील सतत पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. बागेत निघालेल्या नवीन फुटींवर करपा व डाऊनी मिल्ड्यू या रोगांचा प्रादुर्भाव मुख्यतः दिसतो. अशा बागेत पानगळ होताना दिसून येईल. यावर त्वरित उपाययोजना करताना बागेतील कोवळ्या फुटी काढून टाकाव्यात. त्यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी त्वरित करावी. कॅनॉपीमध्ये गर्दी अधिक वाढल्यास डाऊनी मिल्ड्यूची समस्या जास्त प्रमाणात राहील. तेव्हा कॅनॉपी मोकळी ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
द्राक्ष बागेत सध्या काही बागांमध्ये महत्त्वाचा डोळा फुटत (कापसत) असल्याची समस्या दिसून येते.
ज्या बागेत बऱ्यापैकी पानगळ झाली व नवीन निघालेली फूटसुद्धा काढून टाकलेल्या बागेत ही समस्या जास्त दिसते. आपण फळछाटणीपूर्वी पानगळ करतो, तशीच परिस्थिती आता रोगांच्या प्रादुर्भावामुळे उद्भवली आहे.
त्यावर मात करण्याकरिता काडीवर येणारी नवीन फूट तशीच वाढू द्यावी. ही फूट 4-5 पानांची झाल्यानंतर शेंडापिचिंग (फक्त टिकली मारणे) करावे. असे केल्याने खालचा महत्त्वाचा डोळा सुप्तावस्थेत राहील व फुटणार नाही. आपल्याला फळछाटणीकरिता काही वेळ थांबता येईल.
कलम करतेवेळी आपण परिपक्व झालेली काडी सायनकाडी वापरतो. ही काडी दोन डोळ्यांची असते. कलम केल्यानंतर ही काडी जवळपास 18 ते 20 दिवसांमध्ये फुटते.
020 - 26956060
(लेखक द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत:अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे...
एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही आ...