हवामानातील बदलाचा अन्नधान्य, पशुपालन आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास व कृषी विस्ताराकरिता "राष्ट्रीय कृषी प्रकल्पा'ची अं मलबजावणी करण्यात येत आहे. देशातील 100 जिल्ह्यांची याकरिता निवड करण्यात आली असून, यात महाराष्ट्रातील पुणे, नगर, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, भंडारा, रत्नागिरी या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रामाफर् त हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (नवी दिल्ली) आणि केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (हैदराबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने हवामानातील बदलावर आधारित "राष्ट्रीय कृषी प्रकल्पा'ची संकल्पना पुढे आली आहे.
याकरिता निवडण्यात आलेल्या 100 जिल्ह्यांत प्रतिकूल हवामानामुळे कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर नेहमी होणारे परिणाम तसेच या बदलास अनुकूल असणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने पथदर्शक प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. किमान सात वर्षे हा प्रकल्प राबविण्यात येणार असून वर्षभरातील यासंदर्भातील अभ्यास अहवाल संबंधित संस्थांना पाठविण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथे हा प्रकल्प बाभळेश्वर (ता. राहाता) येथील पायरन्स कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पात केवळ अभ्यास व कृषी विस्तारच नसून निवडलेल्या गावात विविध कृषी आणि ग्रामविकास योजना राबविल्या जाणार आहे. याकरिता गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, पीक पद्धतीचा अवलंब, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय, चारा पिके, इतर सेवा सुविधांची उपलब्धता आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हवामान बदलाला सामोरे जाताना देशातील कृषी संशोधन उपयुक्त ठरत आहे का, याची पडताळणी व अभ्यास या प्रकल्पान्वये करण्यात येणार आहे. तसेच या बदलास सामोरे जाण्याकरिता शेतकऱ्यांकरिता अनुकूल तंत्रज्ञानाचा विस्तारही करण्यात येणार आहे.
- डॉ. भास्कर गायकवाड, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...