सध्याचे ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगाची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
काकडीवर्गीय वेलवर्गीय भाज्या, गवार, टोमॅटो, मिरची, वाटाणा आणि आंबा मोहोरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
लक्षणेसध्याच्या परिस्थितीमध्ये कांदा, बटाटा या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. कांद्याच्या पातीवर जांभळट लंबगोलाकार ठिपके दिसतात. बटाटाच्या पानावर गोलाकार तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके एकमेकांत मिसळतात. यामुळे तीव्रता वाढताच संपूर्ण पीक करपलेले दिसते.
उपायअसलेल्या बागांमध्ये देवी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल.
लक्षणेफळांवरती तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसतात. या ठिपक्याच्यावर बोट फिरविले असता उंचवटा सहज जाणवतो. संपूर्ण फळावर याचे व्रण पसरतात, फळ विक्रीयोग्य राहत नाही.
उपायपेरूची फळे सुपारी एवढी असल्यापासून दर 15 दिवसांच्या अंतराने मॅंन्कोझेब 25 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अंजीराच्या पानावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. अवकाळी पावसाच्या वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर पानगळ होईल. ज्या शेतकऱ्यांच्या बागेत खट्टा बहराची फळे आहेत, ती फळे पानगळ झाल्यामुळे चांगली पोसणार नाहीत. अशा फळांवरसुद्धा तांबेरा रोगाची लक्षणे दिसतील.
लक्षणेपानांच्या खालच्या बाजूने तांबेरा रोगाच्या नारिंगी रंगाच्या पुळ्या दिसतात. संपूर्ण पानभर या पुळ्या सध्याच्या हवामानामुळे पसरतील. साधारणपणे जून पानांच्यावर या रोगाची लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात. रोग नियंत्रणाचे उपाय योजल्यास कोवळी पाने रोगमुक्त राहण्यास मदत होईल. तांबेरा रोगाच्या पुळ्या फळे, फळाचे देठ, कोवळ्या फांद्यावर दिसतात.
उपायतांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरथॅलोनील 20 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने गरजेनुसार चार ते पाच फवारण्या कराव्यात.
ज्या बागांमध्ये उशिराच्या बहाराची फळे झाडावर आहेत अशा फळांच्या देठाजवळ ऍन्थ्रॅकनोज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल. पावसाच्या थेंबामुळे बुरशीचे बीज फांद्या, देठावरून वाहून येऊन फळाच्या देठाजवळच्या खोलगट भागात साचतील. ओलसरपणामुळे बीजाणू रूजून रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. फळे देठाकडून काळी पडण्यास सुरवात होईल. सध्याच्या हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ शकतो.
उपायबोर्डो मिश्रणाची (1 टक्का ) फवारणी करावी.
ज्या परिसरात तेलकट डाग रोगाची समस्या कमी-जास्त प्रमाणात आहे तेथे सध्याच्या दमट आणि थंडीविरहित रात्रीमुळे पाने, फळे, फांदी, फळांवर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढेल.
उपायअशा बागांमध्ये रोगाच्या तीव्रतेनुसार बॅक्टीनाशक 250 पीपीएम (1 ग्रॅम प्रति चार लिटर पाणी) ते 500 पीपीएम (एक ग्रॅम प्रति दोन लिटर पाणी) अधिक कॅप्टन अर्धा टक्के (एक ग्रॅम प्रति दोन लिटर पाणी) 2 ते 3 वेळा फवारावे. मधूनच एक टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
पपईच्या बुंध्याजवळ पाणी साठून राहिल्यास बुंधाकूज या रोगाचा प्रादुर्भाव होऊन काही तासांमध्ये मोठी फळधारणा झालेली झाडे कोलमडून पडतात.
उपायया रोगाच्या नियंत्रणासाठी पपई लागवडीमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
टीप : फवारणीच्या द्रावणात अर्धा मि.लि.सर्फेक्टंट प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावा.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्राध्ये साधारणतः ४० लाख हेक्टर क्षेत्रावर ...
सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर...
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...
मागील काही वर्षांच्या निरीक्षणातून, डिसेंबरच्या दु...