অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार

देवळी तालुक्यामध्ये (जि. वर्धा) खडी गावातील शेतकरी श्री. संकटे व इतर कारणांमुळे शेतीतील अल्पशा उत्पन्नातून कुटुंबाचा गाडा पुढे सुरू ठेवणे अवघड झाल्यामुळे श्री. गंडे हतबल झाले होते. परंतु, गावातील तीन बेरोजगार तरुणांना एकत्र करून शैळीपालनाचा व्यवसाय त्यांनी सुरू करून कुटुंबाला आर्थिक आधार दिला आहे.

स्वयंसहाय्यता एक सुरुवात

श्री . गंडे यांनी शिक्षण सोडून दिल्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करणे आवश्यक होते. वडिलोपार्जेित २ एकर शेती होती; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायचा. वृद्ध आई-वडिलांच्या औषधांसाठी पैसे लागत होते. अशा वेळी पेंसा उभारण्यासाठी काही तरी नवीन करावें, ही इच्छा त्यांच्या मनात घर करून होती. परंतु काय करावे, कुणाकडून मार्गदर्शन घ्यावे, आर्थिक सहाय्य कोण पुरविणार हे प्रश्न त्यांना पडायचे. यातच एक आशेचा व्यवसाय त्यांचे लक्ष वेधून घ्यायचा. परंतु, या व्यक्सायासाठी पैसा  कुठून आणायचा, असा प्रश्न त्यांना पडत. गावातील त्यांचे सहकारी श्री. किशोर पुंडलीकराच ताजणे, श्री. मोहन सुधाकर शिवरकर यांचीही परिस्थिती वेगळी नव्हती. श्री. ताजणे हे एक-दोन शेळ्या  पाळायचे, तर श्री. शिवरकर हे शेतमजुरी करायचे. यातच एकाची भर म्हणजे श्री. नथन लोढे हे त्यांच्या शेळ्या जंगलात चारण्याकरिता नेत होते. परंतु पुरेसे अर्थार्जन नसल्यामुळे तेसुद्धा नवीन व्यवसायाच्या शोधात होते.

शेळीपालनाचा निर्धार

श्री. गंडे यांनी शैळीपालन करण्याचा आपला परिस्थितीत शेळीपालन व्यवसाय सुरू करायचाच, असा निश्चय केला. शैळीपालनाविषयी शक्य नियोजनाप्रमाणे तितकी माहिती सहकारी चा प्रयत्न करू लागले. यातच त्यांनी आत्मा' व कृषि समृद्धी प्रकल्पाविषयी माहिती मिळवून याबाबत " आत्मा, देवळी व कृषि समृद्धी प्रकल्पातील कर्मचा-यांशी संपर्क साधला. सप्टेंबर २०१३ मध्ये आत्मा , वर्धा यांनी आयोजित केलेल्या शेळीपालन या विषथाचे प्रशिक्षणाकरिता वरील सर्व शैतक-यांनी नोंदणी केली.


बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रातून तीन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच आवश्यक माहितीकरिता पुस्तके व सीडी यांची खरेदी केली.

व्यावसायाला सुरवात

प्रशिक्षणानंतर वेळ वाया न घालवता सर्व भिडी येथे अर्ज केला. नोव्हेंबर २०१३ मध्ये कर्ज मंजूर होऊन ४ लाख रुपयाचे कर्ज बँकेकडून पुरविण्यात आले. या कर्जातून २९ शेळ्या व १ नर पुरविण्यात आले. शेळ्यांकरिता शेड, चारा, लसीकरण, विमा इ. बाबींवर खर्च करण्यात आला व इतर शिल्लक रकम डॉक्टराकडून वेळोवेळी तपासणी केली जाते, डिसेंबर महिन्यापासून एकूण ३९ पिलांचा जन्म झालेला असून त्यापैकी ३२ करडे सुस्थितीत आहेत. तसेच कमीत कमी बाजारभाव ४,०००/- रुपये प्रति नर याप्रमाणे असेल. असे एकूण १७ नरांचे ६८,०००/- एवढा भाव मिळेल. तसेच पूर्ण वर्षात ४० नर तयार होण्याची शक्यता आहे.

श्री. ताजणे व त्यांच्या सहकान्यांच्या मते इतर शेतक-यांनीसुद्धा अशाच जोडधंद्याची कास धराची जेणेकरुन शैतक-यांचा आर्थिक स्तर उंचावून शेती करिता सेंद्रिय खत उपलब्ध होऊन ही जमीन सुजलाम्सुफलाम् करण्यास मदत होईल.

अ.क्र. वर्ष मादी नर अंदाजे उत्पन्न सेंद्रिय खते एकूण उत्पन्न
प्रथम ३०-४० १६०,००० ३ ट्रॉली १६६,०००
द्वितीय ६०-८०- ३२०,००० ६ ट्रॉली ३३२,०००,
तृतीय ९०-१२० ४८०,०००, ९ ट्रॉली ४९८,०००,

 

अंतिम सुधारित : 8/4/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate