महाराष्ट्रातील शेती ही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे आणि पावसाचे प्रमाण हे अनियमित, अनिश्चित असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे नसते. त्यामुळे पिकांची उत्पादकता कमी राहते व त्यात अस्थिरता आढळून येते. याकरिता जेवढे उपलब्ध पाणी आहे, त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन व पीक पध्दतीचे नियोजन करणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील जलसंपत्ती मर्यादित आहे. त्यामुळे उपलब्ध असलेली जलसंपत्ती जास्तीतजास्त कार्यक्षमतेने वापरणे महत्वाचे आहे. यासाठी पिकांचे फेरनियोजन करण्याची गरज आहे. पिकांचे फेरनियोजन करण्याची गरज आहे. पिकांचे नियोजन हे मुख्यतः उपलब्ध पाणीसाठा, पिकांना भविष्यात मिळणारा भाव, किमान आधारभूत अवलंबून असते. कोरडवाहू शेतक-यांचा विचार केल्यास त्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हरभरा अशा पिकांचे नियोजन केल्यास त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
मागील पाच दशकातील कालावधीमध्ये तृणधान्य पिकांखालील क्षेत्रामध्ये घट झालेली आहे. तृणधान्य पिकांपैकी गहू, खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी व भरडधान्य या पिकांखालील क्षेत्रामध्ये विशेषतः अधिक घट झालेली आहे.
गहू व ज्वारी या मुख्य अन्नधान्याच्या पीक क्षेत्रामध्ये घट होत असून ती चिंतेची बाब आहे. आज लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात लोकसंख्येला पुरेल एवढे तृणधान्य निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक आराखड्यात योग्य ते बदल करून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
नियोजनाद्वारे प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. कोरडवाहू क्षेत्र जास्त असल्याने कमी उत्पादन खर्चाचे त्यादृष्टीने मराठवाडा व विदर्भात ज्वारीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येईल. सिंचनाची उपलब्धता असलेल्या क्षेत्रावर गहू पिकास प्रोत्साहन देण्यात येईल.
कोरडवाहू क्षेत्रात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही वर्षात हरभरा व तूर क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, इतर कडधान्य पिकांच्या क्षेत्रामध्ये घट दिसून आलेली आहे. देशाच्या गरजेच्या प्रमाणात कडधान्याची उपलब्धता कमी असल्याने त्यांची आयात करावी लागते. राज्यात कडधान्य उत्पादन वाढीस वाव आहे. मूग व उडीद ही कडधान्य मुख्यत: पावसाच्या पाण्यावर येतात व गेल्या काही वर्षांमध्ये अनियमित, उशिरा व अपुरा पाऊस पडत असल्यामुळे इतर कडधान्यांच्या क्षेत्रामध्ये व पर्यायाने उत्पादनामध्ये घट झालेली आहे. कडधान्य पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने सलग पिकाशिवाय तृणधान्य, कापूस व इतर पिकात आंतरपीक म्हणून कडधान्य पिके घेण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याशिवाय भात पिकाच्या बांधावर तूर लागवड, भात व बटाटा पिकानंतर पडीक राहणा-या जमिनीत रबी हंगामात हरभरा पिकाची लागवड याव्दारे कडधान्य पिकांखालील क्षेत्र व उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
खाद्यतेलाच्या गरजेसाठी अद्याप मोठ्या प्रमाणावर त्यांची आयात करावी लागते. गळीतधान्य पिकांव्दारे कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतक-यांचे निव्वळ उत्पन्न वाढीस वाव आहे. मागील दशकात याबाबत आहे. मात्र भुईमुग, तीळ व करडई या पिकांखालील क्षेत्रात घट झाली आहे. सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढीच्या मर्यादा विचारात घेता आंतरपिकाव्दारे क्षेत्र वृध्दीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग व सिंचन उपलब् मराठवाडा व विदर्भात भुईमुगाखालील क्षेत्र वृध्दी करण्याचे प्रयत्न आहेत. त्याशिवाय तीळ, जवस, कारळी, करडई या पिकांखालील क्षेत्र वृध्दीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस व कापूस या पिकांचा नगदी पिकांमध्ये समावेश होतो. मागील पाच दशकात ऊस व कापूस या पिकांच्या क्षेत्रामध्ये भरीव वाढ झालेली आहे. मात्र, या दोन्ही पिकांचा कालावधी दिर्घ असल्याने त्यांची पाण्याची गरज जास्त आहे.पाणी वापराचा व प्रति युनिट निव्वळ उत्पन्नाचा विचार केल्यास ऊसापेक्षा अन्नधान्य पिकांमध्ये पाण्याची कार्यक्षमता जास्त आहे. सिंचनसुविधेच्या मर्यादा लक्षात घेता ऊस पिकाखालील जास्तीतजास्त क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणून उर्वरित पाण्याचा इतर पिकांसाठी वापर करण्याबाबत शेतक-यांना प्रेरीत करण्या येईल. तसेच कापूस पिकाखालील क्षेत्रही सुक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न आहेत.
पूर्वीची पीक पद्धत, त्यातील टप्पे व पध्दतीतील फेरबदल यादृष्टीने भविष्यामध्ये पीक पद्धत कशी असावी तसेच त्यासाठीच्या संभाव्य बाबी खालीलप्रमाणे.
संपर्क क्र. ९४२२o८९१८o
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 4/14/2020
सोयाबीन हे पीक भारत देशाला तसे नवीन नाही. हिमालयाच...
राष्ट्र राज्य हे कडधान्य पिकाच्या उत्पादनांमध्ये द...
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...
सध्या तुरीचे पीक फुलकळी येण्याच्या अवस्थेत आहे. या...