অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्षबागेचे व्यवस्थापन - खरड छाटणीनंतर

द्राक्षबागेत सध्या खरड छाटणीची लगबग सुरू आहे. एप्रिल महिन्यात सुरवातीसच तापमान कमी-जास्त होताना दिसत आहे. अशा तापमानाचा बागेत खरड छाटणीनंतर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन बागेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने ठेवावे लागले याची माहिती आजच्या लेखात घेत

क्र. १ - खरड छाटणी न झालेली बाग

  1. ज्या बागेत अजून खरड छाटणी झाली नाही अशा बागेमध्ये वाढत्या व कमी होणाऱ्या तापमानाचा कुठलाही परिणाम होणार नाही; परंतु या आठवड्यात छाटणी केल्यास डोळे त्यानंतरच्या आठवड्यात डोळे फुटून फुटव्याकरिता आवश्‍यक असलेले तापमान जर नसेल तर एकसारख्या व लवकर फुटींची अपेक्षा करता येणार नाही.
  2. सध्या वातावरणातील तापमानात वाढ होताना दिसत आहे म्हणजेच आर्द्रता नक्कीच कमी होईल. अशा परिस्थितीमध्ये बागेत डोळे फुटण्यास आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात.
  3. डोळे फुटण्याकरिता विशेष म्हणजे जास्त आर्द्रता असणे गरजेचे असते, तेव्हा खरड छाटणी झाली, की ४ ते ५ दिवसांनंतर बागेत बोद पूर्णपणे भिजत राहील याची काळजी घ्यावी. त्याचसोबत ओलांड्यावर सुद्धा आर्द्रता निर्माण होण्याच्या दृष्टीने दिवसातून दोन वेळा पाण्याची फवारणी केल्यास फायदा होईल.

परिस्थिती क्र. २ - खरड छाटणी झालेली बाग

  1. ज्या बागेमध्ये यापूर्वीच खरड छाटणी झाली आहे, अशा बागेत आता डोळे चांगल्याप्रकारे फुटले असावेत. यापूर्वी खरड छाटणी झालेल्या बागेत वातावरणातील तापमान कमी व आर्द्रता जास्त अशी परिस्थिती होती. त्याचाच परिणाम म्हणजे डोळे लवकर फुटले.
  2. या बागेमध्ये आता अनावश्‍यक फुटी कमी कराव्यात. पुढील हंगामात घडाच्या विकासाकरिता आवश्‍यक असलेल्या मोजक्याच फुटी ठेवून इतर निघणाऱ्या अनावश्‍यक, तिरक्या व खालील दिशेने वाढणाऱ्या फुटी काढून टाकाव्यात. या वेळी साधारणतः प्रत्येक वर्गफूट अंतराकरिता ०.५५ ते ०.६० फुटी राखाव्यात. यापेक्षा जास्त असलेल्या फुटी त्वरित काढून टाकाव्यात. यामध्ये एकसारखा जाडीच्या फुटी राखून इतर फुटवे काढणे महत्त्वाचे आहे. तेव्हा जास्त जाड असणाऱ्या व एकदम बारीक अशा उशिरा निघणाऱ्या फुटी त्वरित काढून टाकाव्यात.
  3. ओलांड्यावर ठेवलेल्या फुटींची वाढ अपेक्षेप्रमाणे होण्याकरिता अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थितरित्या वापरला जातो.

परिस्थिती क्र. ३ - द्राक्ष असलेल्या वेलींचे व्यवस्थापन

काही बागांमध्ये अजूनही वेलीवर द्राक्ष आहेत. खरे तर खरड छाटणीपूर्वी वेलीस १० ते १२ दिवस विश्रांती आवश्‍यक असते. त्यानंतरच छाटणी घेऊन वेलीवरून फुटी निघणे सोपे होते. जर वेलीवर १५० दिवसांपेक्षा जास्त वेळ द्राक्षघड राहिले तर वेलीवर ताण बसेल. त्याचाच परिणाम म्हणजे खरड छाटणीनंतर फुटी लवकर निघणार नाहीत किंवा अशक्त फुटी बाहेर येतील. ही परिस्थिती टाळण्याकरिता वेलीवरून द्राक्षघड लवकर कमी करावेत. बागेला थोडीफार विश्रांती देऊनच खरड छाटणी घ्यावी.

परिस्थिती क्र. ४ - बाग फुटायला उशीर होण्याची स्थिती

  1. बरेच शेतकरी खरड छाटणीनंतर बाग फुटायला बराच उशीर लागत असल्याचे सांगतात. या शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असे कळते की हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग केलेले नाही.
  2. खरड छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग केले नाही म्हणून बाग फुटत नाही असे नाही. अशा परिस्थितीमध्ये बाग फुटेल, परंतु फार उशीर लागेल. बाग मागे-पुढे फुटण्याची समस्या दिसेल.
  3. अशा वेळी बागेत भरपूर पाणी देऊन (जसे की बोद पूर्णपणे ओले ठेवणे, ओलांड्यावर पाण्याची फवारणी करणे किंवा बागेत मोकळे पाणी देणे इ.) बाग फुटेल; परंतु पेस्टिंग केले नसेल तर या परिस्थितीत सुद्धा बाग थोडीफार उशिरा फुटेल.
  4. डोळे फुटण्याकरिता वाया गेलेला वेळ फुटींची लवकर व चांगली वाढ होण्याकरिता उपयोगात आणावा. त्याकरिता २० ते २५ मि.लि.हायड्रोजन सायनामाईड प्रति लिटर पाण्यात मिसळून पाठीवरील पंपाने फवारणी करावी किंवा उपलब्ध परिस्थितीनुसार पेस्टिंग करावे. असे केल्यास पुढील अडचणी टाळता येईल.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate