ज्या बागेमध्ये फूट आधीच काढली असून, काडीसुद्धा परिपक्व झालेली आहे; परंतु भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानगळ बऱ्यापैकी झाली किंवा होत आहे, अशा बागेत शेंड्याकडे नवीन फुटी वाढू देणे गरजेचे आहे. बागेत सध्याची परिस्थिती कलम करण्यासाठी योग्य आहे, त्या दृष्टीने नियोजन करावे.
गेल्या आठवड्यात प्रत्येक विभागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. यानंतरच्या काळात पाऊस कमी होऊन ढगाळी वातावरण दिसते. अशा या वातावरणात सध्या तरी रिमझिम व पावसाची उघडीप दिसून येत आहे. बागेमध्ये आर्द्रता भरपूर निर्माण झाल्यामुळे आता नवीन फुटींची वाढ जोमात दिसून येईल. अशा परिस्थितीमध्ये बागेत नवीन फूट जर जोरात वाढत असल्यास काडीची परिपक्वता होण्यास उशीर लागेल, त्याचसोबत नवीन कॅनोपीवर भुरी रोगांचा प्रादुर्भावसुद्धा जास्त होईल. १) रोगांचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात वाढल्यास रोगांचे जीवाणू पानांमधून रस शोषून घेऊन त्या पानाच्या देठाची असलेली काडीशी पकड ढिली होईल. अशाच प्रकारे पानगळ होण्यास सुरवात होईल. तेव्हा रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने काडीची नवीन फूट काढून टाकावी. २) ज्या बागेमध्ये फूट आधीच काढली असून, काडीसुद्धा परिपक्व झालेली आहे; परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानगळ बऱ्यापैकी झाली किंवा होत आहे, अशा बागेत शेंड्याकडे नवीन फुटी वाढू देणे गरजेचे आहे. कारण शेंडा पिचिंग केला व पानगळ जर पूर्ण झाली तर फळछाटणी लवकर घ्यावी लागू शकते. हे टाळण्याकरिता बागेत शेंडावाढ लवकर करून ३ ते ४ पाने अवस्थेमध्ये पिचिंग केल्यास मागील डोळे फुटणार नाहीत, फळछाटणी होण्यास पुन्हा काही वेळ थांबता येईल.
१ ) २५ ऑगस्टपासून सुरू होईल. कलम यशस्वी होण्याकरिता बागेतील तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते ९० टक्के असावी.
२) कलम करणाऱ्या व्यक्तीची कुशलतासुद्धा तितकीच महत्त्वाची असते. बागेत ही परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून दिसून येते. तेव्हा आता कलम करण्याचे नियोजन करावे.
३) कलमी करणाच्या दृष्टीने खुंटरोपांच्या निघालेल्या सर्वच फुटींपैकी ८ ते १० मि.मी. जाड, सरळ वाढणाऱ्या व सशक्त अशा फुटी राखून इतर फुटी काढून टाकाव्यात. या उरलेल्या शिल्लक फुटी बांबूला बांधून घ्याव्यात.
४) महत्त्वाचे म्हणजे कलम करण्याकरिता राखलेल्या फुटींच्या बगलफुटी काढता येईल; परंतु शेंडा किंवा काडी अर्ध्यातून कापू नये. ही काडी कलम करते वेळीच फक्त कापावी, अन्यथा, खुंटकाडीमधून कलम करण्यापूर्वीच पाणी निघून जाईल, कलम यशस्वी होण्यास अडथळा निर्माण होईल.
०२० - २६९५६०६०
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत- अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020