অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोसंबीच्या झाडाला द्या योग्य प्रकारे ताण

मोसंबीच्या झाडाला द्या योग्य प्रकारे ताण

फळे घेण्यापूर्वी मोसंबीच्या झाडाची चांगली व जोमदार वाढ झालेली असावी. झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी. ही स्थिती लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षांत झाडांची योग्य निगा घेतल्यानंतर येते. झाडांची वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देऊन कमी प्रमाणात फळे घ्यावीत.

  • ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत.
  • बागेचे पाणी हळूहळू कमी करत नंतर बंद करावे.
  • ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या वयानुसार कमीजास्त होऊ शकतो. भारी जमिनीत व ओल धरून ठेवणाऱ्या जमिनीत बागेस एक हलकी नांगरट करावी. नांगरटीमुळे मुळ्यांची थोडी छाटणी होऊन झाडांना पाणीपुरवठा कमी होतो. झाडांची वाढ थांबते.
  • ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरू असते. 25 टक्के पाणगळ झाल्यास ताण बसला असे समजावे.
  • पानांनी तयार केलेले कर्बयुक्त अन्न झाडांच्या फांद्यात साठते. या कर्बयुक्त अन्नपदार्थांचा उपयोग झाडांना नवीन पालवी फुटण्यास, फुले येण्यास फलधारणा होण्यास मदत होते. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.
  • ताण जरुरीपेक्षा जास्त बसणार नाही याची खाळजी घ्यावी.

ताण कसा सोडावा

  • आंबे बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण दिला असेल तर विहिरीचे हलक्‍या प्रमाणात पाणी देऊन ताण सोडावा. या वेळी भरखते, संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धेनत्र देऊन आंबवणी द्यावे. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पानी (चिंबवणी) द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे.
  • ताण सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी फुले येतात.
  • त्यानंतर उरलेल्या नत्रांचा (निम्मा) हप्ता एक ते दीड महिन्यानी द्यावा. हलक्‍या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यांत विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

आंबेबहार ठरतो खात्रीचा


मृग बहाराच्या बागेस ताण सोडण्याची प्रक्रिया पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने हा बहार बऱ्याच वेळा खात्रीशीर ठरत नाही. मृग बहारामध्ये मोसंबीच्या बागेत झाडावर वाजवीपेक्षा अधिक ताण आल्यास काही करता येत नाही. एकतर विहिरीला पाणी कमी असल्याने शेतकरी हा बहार घेतात आणि विहिरीला जरी पाणी असले तरी बागेस जास्त ताण बसल्यावर विहिरीचे पाणी देण्याची व्यवस्था केली तरी फायदा होत नाही. बाहेरचे तापमान खूप जास्त असल्याने पाणी देऊन बाग ताणाच्या धोक्‍यापासून वाचविली तरी आलेली फुले टिकत नाहीत. याशिवाय या बहारास वळवाच्या पावसामुळे धोका निर्माण होतो, मध्येच बागेची ताणाची स्थिती बिघडते आणि नुकसान होते. 
त्या तुलनेत आंबे बहाराच्या मोसंबी बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहार ठरतो.


संपर्क ः 02482-261766.
डॉ. एम. बी. पाटील, 7588598242 
(मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate