অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊसासाठी पाणी व्यवस्थापन

ऊसासाठी पाणी व्यवस्थापन

ऊसशेतीमद्धे पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे. म्हणून पाण्याचा कार्यक्षम, काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे. ऊसपिकाला सरी वरंबा, कटवाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत, सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एकसरी पट्टापद्धत, रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन- रेनगन तुषार सिंचन पद्धत ई. पद्धतीने पाणी दिले जाते.

उसाच्या पिकाला ऊस उगवे पर्यंत म्हणजे पहिला १// महिना १/३ सरी भिजेल एवढ, फुटव्याचा कालावधी १// ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊण सरी भिजेल एवढ आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पानसरी भिजेल एवढे पाणी द्यावे. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागवनी पासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातल अंतर कमी- जास्त कराव. पारंपारिक सरी, कट पद्धत, सरी वरंबा -नागमोडी पद्धतीने पनी देण्यात कोणताच फायदा होत नाही. उत्पादन कमी येते. जमिनी नापीक बनतात. पाणी जास्त लागते. म्हणून पारंपारिक सिंचनाच्या पद्धती बदलून लांब सरी पद्धतीने पाणी द्यावे. त्याचे अनेक फायदे होतात. रानबांधनीच्या खर्चात बचत, लागवडीखालचे क्षेत्र वाढते, पाणी कमी लागते. हवा- पाणी + अन्नद्रव्यांचे योग्य संतुलन होते. आंतर मशागत सुलभ आणि कमी खर्चात होते. असे अनेक फायदे होतात.

पट्टा पद्धत

पट्टापद्धत ठिबक सिंचनासाठी जास्त उपयुक्त ठरते. तसेच पाटपाण्यासाठी सुद्धा. कारण पहिले ४ महिने ८०% क्षेत्रावर पाण्याचा वापर, तर मोठ्या बांधणीनंतर ४०% क्षेत्रावरच पाण्याचा वापर होतो. १० ते २०% पाणी कमी लागते. पट्ट्यांत आछ्यादन केल्यास आणखी पाणी वापर कमी होतो. शिवाय पट्टा पद्धतीचे जे काही इतर फायदे आहेत ते मिळतातच.

एका सरीत पाणी तर दुसरी रिकामी अश्या पद्धतीने एकसरी पट्टा पद्धतीने उसाच्या सरीला पाणी दिले असता १५ ते २०% पाणी कमी लागते. रिकाम्या सरीला पट्टा पद्धतीप्रमाणे आंतरपीक घेत येते. पाचटाचे आछ्यादन करता येते. उत्पादन कमी पाण्यात जास्त मिळते.

पट्टा पद्धतीने उसाची लागण करून ठिबक-सिंचनाद्वारे पाणी देत येते. गरजेइतकेच मुळाजवळ पाणी दिल्याने पाण्यात ४० ते ५०% बचत होते आणि उत्पादनात २५ ते ३०% वाढ होते. याशिवाय द्रवरूप खत ठिबक सिंचनातून दिल्यास खतमात्रेत ३०% बचत होते. उत्पादन मात्र वाढीव मिळते. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्याने जमीन नापीक होत नाही. फक्त गरज असते ठिबक- सिंचन सुरळीत चालण्यासाठी वेळच्या वेळी योग्य ती निगा राखण्याची.

शक्यतो ऊसपिकाल ऊस मोठा झाल्यानंतर साधी तुषार सिंचन पद्धत तितकीशी फायद्याची नाही. पण रेनगन तुषार सिंचन पद्धत फायद्याची ठरली आहे. १ अगर २ रेनगनमद्धे संपूर्ण शेत भिजवत येते. गरजेइतके पाणी देत येत असल्यामुळे पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळता येतो. पाचटाचे आछ्यादन केले असल्यास पाचट लवकर कुजते. ठिबकपेक्षा खर्च कमी येतो. विद्राव्य खते देता येतात. ऊस पावसाच्या पाण्यासारखा धुतला जात असल्याने किडी - रोग कमी येतात.

सुरु साठी २५०, पूर्व हंगामासाठी २७५ आणि आडसालीसाठी ३५० हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हवामान-जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाचे वय ई. वर पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवावे. पाणी मोजण्यासाठी 'कटथ्रोट फ्ल्युम' या पाणी मोजण्याच्या साधनाचा वापर करावा.

ऋतूमानानुसार पाणी व्यवस्थापन

भारी जमिनीत-

* पावसाळ्यात २६ दिवसांनी

* हिवाळ्यात २० दिवसांनी

* उन्हाळ्यात १२-१३ दिवसांनी

मध्यम जमिनीत-

* पावसाळ्यात १८ दिवसांनी

* हिवाळ्यात १४ दिवसांनी

* उन्हाळ्यात ९ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पाणी कमी पडल तर पाचटाचे आछ्यादन, केओलीनाचा वापर, पोटश २५% जास्त द्यावे, तण नियंत्रण, पाट स्वछ्य ठेवावेत आणि विशेष म्हणजे महिन्यातील पाण्याची उपलब्धता पाहून ऊसाखाली क्षेत्र घ्यावे.

अश्या पद्धतीचे पाणी व्यवस्थापन ऊसासाठी उपयुक्त आहे.

स्त्रोत: कृषी प्रवचने, लेखक: प्रल्हाद यादव, विमल प्रकाशन- पुणे, प्रथम आवृत्ती- जानेवारी - २०१२.

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate