फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते, त्यासाठी शेतकऱ्याला पहिल्या वर्षीचा हप्ता ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के रक्कम अनुदान मिळते.
दुसऱ्या वर्षीचे अनुदान मिळण्यासाठी बागेतील ७५ टक्के झाडे जिवंत असली पाहिजेत. तिसऱ्या वर्षीच्या अनुदानासाठी ९० टक्के झाडे बागेत सुस्थितीत असली पाहिजे.
अनुदान मिळण्यासाठी बागेचे क्षेत्र ०.२० आरपासून चार हेक्टरपर्यंत असावे. कोकणासाठी ०.१० आरपासून दहा हेक्टर क्षेत्र असावे. अनुदान मिळविण्यासाठी फळबाग लागवडीची तयारी म्हणजे जमीन तयार करणे, खड्डे खोदणे आदी तयारी करावी लागते, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी याविषयी पाहणी करून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करतात.
या अनुदानाविषयी अधिक माहिती आपल्या तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यास मिळू शकेल.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...