शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, हा शेतकरी मंडळ स्थापनेमागील मुख्य उद्देश असतो. मंडळात कमीत कमी, दहा (प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश) सदस्य असावेत.
दहाच्यावर मंडळाच्या सदस्यसंख्येवर मर्यादा नाही. ही मंडळे बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करतात. त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादींविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते; तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही मंडळे करतात. याच संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि तंत्र विद्यालये येथे एकूण ४० शेतकरी-शास्त्रज्ञ मंचांची स्थापना केली आहे.
अंतिम सुधारित : 8/31/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...