‘पाहू द्या रे मज विठोबाचे रुप’ असे म्हणत टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी विठु माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीपासून पायी वारी करतात. भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात ‘ज्ञानोबा-माऊली’ चा जयघोष करीत, आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेत वारकऱ्यांची मार्गक्रमणा चालू असते. पारंपरिक पद्धतीने वारी जात असतानाच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समितीतर्फे निर्मलवारी आणि हरितवारी असे समाजाभिमूख कार्यक्रमही राबविण्यात येतात. यावर्षीची वारी आधुनिकतेचा वापर करणारी असणार आहे. जसजसा तंत्रज्ञानात बदल होत आहे तसे वारीही आधुनिक होऊ लागली आहे. आता वारीही मोबाईलच्या ‘ॲप’वर आली आहे.
मानवाचे जीवन सध्या वेगवेगळ्या ‘ॲप’ने व्यापले आहे. मोबाईलवरील ॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पालखी सोहळ्यानिमित्त दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन व नियोजन, वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी, सुविधांची माहिती मिळावी यासाठी ‘पालखी सोहळा 2017’ हे मोबाईल ॲप विकसीत करण्यात आले आहे. या ॲपमध्ये दिंडी व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना असे तीन विभाग करण्यात आले आहेत. या ॲपमध्ये विविध उपयोगी पर्याय देण्यात आले आहेत.
आषाढी एकादशीपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये वारकरी सहभागी होतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पालखी व्यवस्थापनासंदर्भात या ॲपद्वारे माहिती घेता येणार आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी हे एक परिपूर्ण ॲप आहे. आतापर्यंत जवळपास पंधराशे जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. हे सर्व पाहता यंदाची पंढरीची वारी ॲप वरी, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
संकलन / लेखन : जयंत कर्पे, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 12/22/2019
शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड दिली तर फायदा होत...
ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा...
रवाशांच्या सुरक्षेसाठी व त्यांना प्रवासादरम्यान आप...
रेल्वे तिकीट काढताना भल्या मोठ्या रांगेत उभे राहण्...