"डिजिटल तंत्रज्ञानानेयुक्त आणि माहितीने परिपूर्ण समाज व ज्ञानाधीष्ठित अर्थव्यवस्था असलेला डिजिटल सक्षम भारत निर्माण करणे हे ध्येय आहे. आयटी Indian Talent (भारतीय प्रतिभा) + Information Technology (माहिती तंत्रज्ञान) = Future India (उद्याचा भारत).
डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे उदिष्ठ इलेक्ट्रॉनिक सेवा, उत्पादने, रोजगार/नोकरीइ.मधील संधी निर्माण करणे होय.
डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे ध्येय हे तीन कळीच्या क्षेत्राभोवती केंद्रित आहे:-
हा कार्यक्रम विविध केंद्रीय मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकारच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानविभाग(DeitY) द्वारे समन्वित करण्यात आला आहे.
डिजिटल इंडियासप्ताह कार्यक्रमाची सुरुवात 1 जुलै, 2015 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या दरम्यान नवीन उत्पादने आणि डिजिटल लॉकरसारख्या ई-सेवांचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
1 जुलै पासून डिजिटल इंडिया साप्ताह कार्यक्रमांतर्गत नागरिकांना प्रभावीपणे संदेश वितरीत करण्यासाठी देशभरात जागरूकता आणि संवाद यांचा समावेश कार्यक्रमात आयोजन करण्यात येणार आहे.
डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या परिवर्तनाचा परिणाम,सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध स्तरांवर जसे गाव, तालुका , नगरपालिका, उपविभाग, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरघेण्यात येणार आहे.
डिजिटल इंडियाकार्यक्रमांतर्गत नागरिकांना माहिती आणि शिक्षण देण्याचे सामाईक सेवा केंद्र, डाक कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत इत्यादीच्या माध्यमातून आयोजन करण्यात येणार आहे.
या डीजीटल ड्राइव्हमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि समाजाला डीजीटल सक्षम करावे.
अंतिम सुधारित : 10/7/2020
इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र हे देशातील सर्वात वेग...