केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात कठीण अशी नागरीसेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. लहान-लहान गावातील अनेक मुले या परीक्षेकडे वळत आहेत. युपीएसएसीची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते त्यात पहिला पेपर हा सामान्य अध्ययन 200 गुण व दुसरा पेपर सी-सॅट 200 गुण असे 400 गुण या पूर्व परीक्षेसाठी असतात. ही परीक्षा 5वी ते 10वीच्या तसेच एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या व सामान्यज्ञानाच्या धर्तीवर असते, तर सी-सॅटचा पेपर हा निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, समस्या सोडवणूक, तर्कनिष्ठपणा, बुद्धिमत्ता यावर आधारित असतो. या परीक्षेत फक्त सामान्य अध्ययन हा पेपरच यशस्वितेसाठी ग्राह्य धरला जातो. तर सी-सॅट पेपरचे गुण हे साधारण 33 टक्के गुण उत्तीर्णसाठी आवश्यक असतात. या परीक्षेत ज्यांना 120 च्या वर गुण मिळतील ते विद्यार्थी शक्यतो मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आहे. ही मुख्य परीक्षा 1750 गुणांची असते. त्यामध्ये इंग्रजी भाषा हा पेपर अनिवार्य असतो. व दुसरा पेपर भाषेचा असतो. यामध्ये कुठलीही भाषा निवडता येते. या दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी 300 गुण आहेत. मात्र या दोन्ही विषयाचे गुण केवळ उत्तीर्णसाठी ग्राह्य धरले जातात. साधारणत: 35 टक्के गुण त्यामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांची मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये गणना केली जात नाही. जे गुण मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात त्यामध्ये पेपर-ख हा निबंधलेखनाचा असतो त्याला 250 गुण असतात. सामान्य अध्ययनांचे एकूण चार पेपर असतात. या प्रत्येक पेपरला 250 एवढे गुण असतात व हे सर्व पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपात आहेत. यातील सामान्य अध्ययन (खख) या पेपरसाठी भारतीय वारसा, संस्कृती, जागतिक इतिहास-भूगोल आणि समाज इत्यादी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (खखख) या पेपरमध्ये शासन, राज्यघटना, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आदी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (खत) यामध्ये तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, विकास, जैव वैविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आदि घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (त) यामध्ये नैतिक मूल्य, एकात्मता आणि प्रवृत्ती याचा अंतर्भाव आहे. या परीक्षेसाठी दोन विषय वैकल्पिक म्हणून निवडावे लागतात. प्रत्येकी 250 गुण आहेत. या विषयांची यादी अशी - कृषी, पशु विज्ञान, मानववंशशास्त्र, वनस्पती शास्त्र, रसायन शास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकिशास्त्र, वाणिज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूगर्भशास्त्र, भारतीय इतिहास, कायदा, व्यवस्थापन, गणित, इत्यादींचा समावेश आहे. तर मुलाखतीसाठी 275 गुण आहेत. तयारी कशी करावी ही परीक्षा 5 वीं ते पदवीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने प्रारंभी 5 वी ते 10 वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके जमा करावीत तसेच (एनसीईआरटी)ची पुस्तके, काही चालू घडामोडीवर आधारित मासिके एकत्र करून ती वाचावीत. शक्यतो 5वी ते 10वी ची पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वाचून त्यांच्या नोट्स काढाव्यात. नंतर आपण जे विषय ऐच्छिक निवडणार आहोत त्याची पुस्तके दोन-तीन वेळा वाचून काढावीत. तुम्ही जेवढी उजळणी कराल तेवढे तुम्हाला परीक्षेत आठवेल. या परीक्षेसाठी बाजारात खूप संदर्भसाहित्य उपलब्ध आहे. पण नेमकेपणाने कुठले साहित्य वाचले पाहिजे, हे समजायला हवे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व परीक्षेच्या संधी यूपीएससी परीक्षेसाठी कुठल्याही विषयातील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असते. खुल्या प्रर्वगासाठी 32 वर्ष एवढी वयाची अट असून त्यांना 6 वेळा परीक्षा देता येते. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना वयाच्या 37 वर्षांपर्यंत परीक्षा देता येते. त्यांना कितीही वेळा परीक्षेला बसता येऊ शकते. इतर मागासवर्गीयांसाठी 35 वर्ष वयाची अट असून 9 वेळा परीक्षेची संधी आहे. परीक्षेचा संभाव्य कालावधी यूपीएससी नियमितपणे ही परीक्षा घेत असते. दरवर्षी साधारण 1000 ते 1200 जागांसाठी यूपीएससीची जाहिरात दर वर्षी मे महिन्यात येते. यूपीएससीची पूर्व परीक्षा साधारणत: ऑगस्ट महिन्यात होते व निकाल ऑक्टोबरमध्ये लागतो. मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये तर निकाल मार्चमध्ये लागतो व मुलाखती एप्रिल-मे मध्ये घेतल्या जातात व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यशस्वी झालेल्या उमेदवारांची घोषणा केली जाते व त्यांना गुणानुक्रमे केडर दिले जाते. लेखक - डॉ.बबन जोगदंड स्त्रोत - महान्युज