नवरात्री उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. तसेच अहमदनगर जिल्हेच्या अकोले तालुक्यात देखील साजरा केला जातो. या नवरात्री दरम्यान अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात काही आदिवासी वैद्य लोक आपल्या मुलास वनऔषधी वनस्पतींची ओळख करून देतात. तर काही वैद्य आपल्या मुलावर वैद्य कामाची जबाबदारी सोपवतात. बरेच वैद्य याच दरम्यान वनऔषधी संग्रह करतात. एकंदरीत हे नऊ दिवस आदिवासींच्या दृष्टीकोनातुन महत्वपूर्ण व शुभ असतात. याच दरम्यान पाचव्या माळेस ( पाचव्या दिवशी ) व सातव्या माळेस ( सातव्या दिवशी ) पांढरी नावाच्या वनस्पतीची घरात संग्रही ठेवण्याची प्रथा आदिवासी समाजात रुढ आहे. ही काठी प्रवेश व्दाराच्या वरती किंवा घरात ठेवल्याने सर्पदंशाचा धोका टळतो व घरात सुख समाधान प्राप्त होते. असा समज आहे. या मागे काय शास्र आहे. लोंकाना माहित नाही, परंतु फार पूर्वी पासून लोक या वनस्पतीची साध्या पध्दतीने पूजा करून संग्रह करतात. मात्र अलीकडे शहरातील काही शिकलेले लोक देखील या काठीचा प्रतिवर्ष संग्रह करू लागले आहेत. त्यामुळे कळसुबाई डोंगरावर व राजुर शहरात काही प्रमाणात काठीची विक्री करतात. शहरातील व्यापारी, वहान चालक ( जीप चालक) काही प्रमाणात खरेदी करतात. या काठीची लांबी साधरण ४ फुट इतकी असते. त्यामुळे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात पांढरी वनस्पतीची तोड केली जाते. यामुळे भविष्यात या वनस्पतीचे प्रमाण कमी होऊ शकते.
मी संस्कृती व प्रथा विरोधात नाही . परंतु ४ फूटाऐवजी अर्ध्या फूटाचाच तुकडा घरात संग्रही ठेवला तर ! काय अडचण आहे ? ही काठी केवळ घरात संग्रही असते. तिचा इतर कारणासाठी उपयोग करत नाही. मला वाटतं पांढरीची काठी वापरावी पण मर्यादित ! भावी पिढीलाही तिचा वापर करता यावा. म्हणून ती वाढवण्यासाठीही प्रयत्न करुया !
लेखन: बाळू निवृत्ती भांगरे
अंतिम सुधारित : 7/25/2020