याचा उदय चौदाव्या शतकात झाला.
या घराण्यात अठरा महत्त्वाचे पुरूष होऊन गेले. त्यांपैकी दुसरा पुरूष संग्रामशाह (१४८०-१५३०) याने चौरागढचा किल्ला बांधला. याची सून राणी दुर्गावती हिने आपला पती दलपतशाह याच्या पश्चात राज्य सांभाळले. १५६४ मध्ये अकबराचा सरदार आसफखान याने दुर्गावतीच्या राज्यावर स्वारी केली. दुर्गावती धैर्याने लढली. पण बलाढ्य मोगली सैन्यापुढे तिचा निभाव लागला नाही. तेव्हा पराजित झाल्यावर अब्रूरक्षणार्थ तिने आत्महत्या केली. तिची समाधी व तिने बांधलेला राणीताल गढाजवळ आहेत. बाळाजी बाजीरावाने १७४२ मध्ये या घराण्यातील बारावा पुरुष महाराजशाह याचा पराभव करून गढा-मंडला हे भाग घेतले. १८५७ मध्ये या घराण्यातील पुरुषांनी व रामगढच्या राणीने इंग्रजांविरुद्ध बंडे केली. त्यांबद्दल शंकरशाह व त्याचा मुलगा रघुनाथशाह यांस तोफेच्या तोंडी देण्यात आले. तेव्हा राणीने आत्महत्या केली.
या घराण्यात आठ कर्तृत्ववान पुरुष झाले. मूळ पुरुष जातबा व तिसरा पुरुष बख्तबुलंद हा असून त्याने राज्य वाढविले व नागपूर शहर वसविले. औरंगजेबाचे साहाय्य मिळविण्यासाठी हा सशर्त मुसलमान झाला; पण विवाह मात्र त्याने गोंड मुलींशीच केले. पहिल्या रघुजी भोसल्याने १७४८ मध्ये चौथ्याची बायको रतनकुंवर व तिचा मुलगा बुर्हानशाह यांनी मुसलमानांस साह्य केले म्हणून यांचा बहुतेक प्रदेश आपल्या प्रदेशात सामील केला.
खंडाल्याच्या नरसिंहरायाचे राज्य माळव्याच्या हूशंगशाहने १४३३ मध्ये नष्ट केले.
संदर्भ : 1. Wills, C. V. The Raj-Gond Maharajas of the Satapura Hills, London, 1923.
२. काळे, या. मा. नागपूर प्रांताचा इतिहास, नागपूर, १९३४.
आपटे, भा. कृ.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/23/2020