धर्म संरक्षणासाठी लढणारा निर्वाणी आखाडा
वानंविषयरूपंयच्छुष्कं फलमुदाह्रतम् !
यस्मातु निर्गतं वानं सा निर्वाणस्समीरित: !!
म्हणजे विषय रूप हे सुखलेले फळ असून, त्याला वान म्हटले गेले आहे. वान म्हणजे सुकलेले फळ त्याच्यातून निघून गेले तो निर्वाण अथवा निर्वाणी आखाडा. ज्यातून सर्व अहंमभाव निघून जातात असा आखाडा असेही याला म्हटले जाते. हा आखाडा आठव्या शतकात निर्माण झाल्याचे म्हटले जाते. निर्वाणी आखाड्याची नाशिकमध्ये बैठक नाही. मात्र निर्वाण अंतर्गत येणारा खाकी आखाड्याची नाशिक येथील नागचौकात बैठक आहे. त्यामुळे खाकी निर्वाणी आखाडा असेही खाकी आखाड्याला म्हटले जाते. खाकीचा उच्चार खं- आ- कं असा होतो. खं म्हणजे ब्रह्म, आ म्हणजे स्मरण व कं म्हणजे सुख म्हणून ब्रह्माच्या स्मरणात सुखी असलेला आखाडा म्हणजे खाकी आखाडा असेही म्हटले जाते. तर खाकी म्हणजे लाठी. अंतिम क्षणापर्यंत झुंजणारे साधू अशी खाकी आखाड्याची ख्याती आहे. या आखाड्याची निर्मिती देशाचे व धर्माच्या संरक्षणासाठी झाल्याचे म्हटले जाते. नाशिक येथील खाकी आखाड्याचे कामकाज महंत नरसिंहदास गुरूपूरणदास खाकी व महंत सर्वेश्वरदास गुरूनरसिंहदास खाकी हे पाहतात. खाकी आखाडा रामाचा उपासक आहे. तर हनुमान हे त्यांचे ध्वजनिशान आहे. सिंहस्थ शाहीस्नानाचा पहिला मान खाकी आखाड्याला मिळाला आहे.
ताम्रपट सांगतोय इतिहास
अमृताचे थेंब नक्की रामकुंडात पडले की, त्र्यंबकेश्वरला हा वाद बराच जुना आहेत. तर अनेकजण सिंहस्थ कुंभमेळा यापूर्वी कधीच या ठिकाणांवर भरत नसल्याचे सांगतात. सिंहस्थ चर्कतिर्थावर भरत असल्याचे उल्लेख काही ताम्रपटांमध्ये मिळतात. तर खाकी आखाड्याकडे असलेल्या ताम्रपटात चर्कतिर्थावर आखाड्यांमध्ये युद्ध झाल्याचा उल्लेख नाही. त्यात फक्त शैव व वैष्णव पंथीयांच्या पेशव्यांनी केलेल्या विभागणीचा उल्लेख आहे. सिंहस्थ नेमका पेशव्यांच्या आधी नेमका कुठे भरत होता. याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी यावरील तारखांवरून संशोधकांना बरेच काही अभ्यासता येईल, असे खाकी आखाड्यातील साधू सांगतात. खाकी आखाड्याची युद्धात मोठी हानी झाल्याचा उल्लेखही या ताम्रपटावर आहे. (संकलन : रमेश पडवळ)
लेखक : रमेश पडवळ
इमेल : rameshpadwal@gmail.com
संपर्क :8380098107
अंतिम सुधारित : 7/28/2023