ग्रामीण तसेच शहरी भागात हिवतापाचे नियंत्रण करणे हे राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांचे उदिष्ट आहे. याकरीता शहरी व ग्रामीण भागात हिवताप नियंत्रणाचे काम सर्वसमावेशक पध्दतीने चालविण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमातंर्गत शहरी भागात अळीनाशक फवारणी, हिवताप रुग्ण शोधून त्यांना समूळ उपचार करणे. यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविण्यात आले. १९७१ मध्ये नागरी हिवताप योजना सुरु करण्यात आली व त्यात १३१ शहरांचा समावेश करण्यात आला. सद्यस्थितीत नागरी हिवताप योजना १९ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १३१ शहरातील १३०.३ लाख लोकसंख्या संरक्षित करीत आहे.
महाराष्ट्रात २.५ कोटी शहरी लोकसंख्या नागरी हिवताप व किटकामार्फत पसरणा-या आजारासाठी संरक्षित केली गेली आहे. यामध्ये एकूण १५ शहरांचा (मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, जळगाव, भुसावळ, नाशिक, नगर, मनमाड, सोलापूर, पंढरपूर, अकोला ) समावेश आहे.
नागरी हिवताप योजनेची मूळ उदिष्ट शक्य त्या सर्व उपाययोजना अंमलात आणून किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी करुन प्रसार रोखणे हा आहे.
नागरी हिवताप योजनेतंर्गत धोरणाचे दोन प्रमुख भाग पुढील प्रमाणे आहेत -
१) परजीवी नियंत्रण २) किटकनियंत्रणनागरी हिवताप नियंत्रण योजनेत खालील उपाययोजना समावेश होतो.
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/3/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...