प्रस्तावना
राज्य रक्तसंक्रमण परिषद या कार्यालयाची स्थापना राज्य शासन निर्णय दिनांक ०२ व ०४ जुलै, १९९६ अन्वये सर्वोच्चं न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. सदर संस्थेचा मूळ उद्देश राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा पुरवठा वाजवी किंमतीत व्हावा असा आहे.
रक्तपेढयाची सद्यस्थिती
राज्यामध्ये आज एकुण २५० परवानाधारक व नोंदणीकृत रक्तपेढया कार्यरत आहेत. रक्त संकलन, रक्ताची तपासणी व त्याचे वितरण परवानाधारक रक्तपेढया मार्फत केले जाते. यापैकी ३१ मोठया रक्तपेढया आहेत व ४१ रक्तपेढया जिल्हा पातळीवर आहेत. रक्तपेढयाचे वर्गीकरण रक्तसंकलनाच्या आधारे करण्यात येते.
रक्तसंक्रमण परिषद संस्थेचे मूळ उद्देश खालीलप्रमाणे
- शिक्षणामार्फत स्वैच्छिक रक्तदान जंनजागृती करणे
- रक्ताच्या योग्य वापरा बाबत जागृती करणे
- नोडल केंद्र / जिल्हा केंद्र व उपविभागीय रक्तसंकलन केंद्र उभारणे
- मानव संसाधन विकास कार्यक्रम राबविणे
राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे कामकाज खालील सदस्यांच्या नियामक मंडळाद्वारे करण्यात येतो.
- सचिव आरोग्य व कुटुंब कल्याण - अध्यक्ष
- संचालक आरोग्य सेवा - सदस्य
- राज्य औषध नियंत्रक - सदस्य
- मंत्रालयातील वित्त विभागाचा प्रतिनिधि - सदस्य
- रेड क्रॉस सोसायटीचा प्रतिनिधि - सदस्य
- खाजगी रक्तपेढीचा प्रतिनिधि - सदस्य
- व राज्यातील औषधी रक्त संक्रमण व आरोग्य संस्था - जास्तीत जास्त 2 तज्ञ
- अशासकीय संस्थेचे सदस्य
- नोडल रक्तपेढीचा सदस्य संचालक राज्य रक्तसंक्रमण परिषद १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व राज्यामध्ये व केंद्र शासित प्रदेशमध्ये रक्तसंक्रमण परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे.
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/28/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.