मानवाने प्रदूषणाला आळा घालणे तर आवश्यक आहेच परंतु, हे काम अप्रत्यक्षपणे वृक्ष अतिशय प्रभावीपणे करू शकतात. संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान ३३ टक्के जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. या बाबतची जाणीव करून देऊन वृक्ष- संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
विविध सरकारे, संस्था आणि व्यक्तींव्दारे जगात वृक्षारोपण केले जात असतेच या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक जागतिक स्वरूप देण्यासाठी ‘वर्ल्ड ट्री डे’ ही संकल्पना राबवली जाते.
स्वत:ची गरज नव्हे, तर चैन पुरवण्यासाठी जंगलतोड करणा-या माणसांमुळे आता सर्वच जीवचक्रांचे आणि साखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. उदा. दर काही महिन्यांनी घरातील फर्निचर बदलणा-यांची हौस भागविण्यासाठी ब्राझीलसारख्या अनेक देशांतील अनेक मोठे वृक्ष तोडले जातात.हे थांबवण्याबरोबरच अधिक झाडे लावणेदेखील सर्वांच्याच जीवनासाठी आवश्यक आहे. याबाबतीत आपणच आपल्या पातळीवर योगदान द्यायला हवे. त्यासाठी स्थानिक जातींच्या झाडांची लागवड करणे, एखादे तरी झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणे असे उपाय करता येतील. शिवाय अनेकदा समाजकंटकांकडून वृक्षतोड होत असते, तेव्हा राष्ट्रीय हरित लवाद, स्थानिक वृक्ष प्राधिकरण अशांसारख्या निमसरकारी विभागांना, सामाजिक संस्थांना किंवा वृत्तपत्रांना आपण थेट कळवून गुन्हेगारांवर कारवाई करू शकता.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 7/8/2020
गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जावे यासा...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...
खारफुटी वनांचे संरक्षण – संवर्धन होण्यासाठी व त्या...
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...