महानगरात वाढत्या लोकसंख्येमुळे तलाव, नदी, सरोवर अशा नैसर्गिक घटकांवर पर्यावरणात्मकदृष्ट्या परिणाम होत आहे. महानगरातही नैसर्गिक सौंदर्य राखले जावे, पर्यावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना सुरू केली आहे.
पायाचा अभ्यास - धरणबांधणीत मजबूत पायाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. साठवलेल्या पाण्याचा, स्वतःच्या वजनाचा, झिरपणाऱ्या पाण्याचा भार, ह्या सारख्या अनेक भार प्रणालींमुळे निर्माण झालेली प्रतिबले धरणाच्या पायावर सोपवली जातात.
राज्यात दि. १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागातून २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता तो उत्स्फुर्त लोकसहभागातून पूर्ण झाला एवढेच नाही तर या एकाच दिवशी राज्यात २ कोटी ८३ लाख झाडं लागली.
वनाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. प्रशासन लोकाभिमुख होऊन वन विभागाशी निगडीत असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे नागरिकांना तत्काळ मिळावित म्हणून वन विभागातील अधिकारी, कर्मचारी व जनता यांच्यामध्ये संवादावर भर दिला जात आहे.
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाने सुरू केली आहे. ‘गिधाड रेस्तरा’ नावाने हा प्रकल्प सुरू झालाय तो नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी.
राज्यात 1 जुलै, 2016 रोजी जनतेच्या सहभागातून दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविल्यामुळे वृक्ष लागवडीला मोठे यश मिळाले.