लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. इ. सन.१६५० पासून जागतिक लोकसंख्येचा अभ्यास सुरु झाला. त्या काळातील म्हणजे १६५० ते १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय मंद होता. कारण त्या काळात सर्व जगात जन्माचे मृत्यूचे प्रमाण हे सारखेच होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु १९२५ ते १९६० नंतर मात्र लोकसंख्येत वाढ होणे सुरु झाले. कारण या काळात आरोग्याची स्थिती सुधारली, विविध लसी आणि औषधांचा शोध लागला. माता व बालक जगविण्याविषयी बहुसंख्य रोगावर लस उपलब्ध झाली. तसेच वैदयकशास्त्रात व चिकित्सा शास्त्रात विशेष क्रांती झाली आणि जवळजवळ सर्वच असाध्य रोगांवर प्रतिबंधक औषधे उपलब्ध झाली. त्यामुळे मृत्युदर घटला. परंतु जन्मदर तोच राहिला.
२१ व्या शतकाच्या १०० वर्षात २०० कोटीमध्ये ७२० कोटींची भर पडून ती १४२० कोटी होईल व ही लोकसंख्या स्थिर होण्यासाठी व वाढीचा दर कमी करण्यासाठी किमान १०० वर्षे लागतील असा अंदाज आहे. अशा लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी माणसावर होणारे परिणाम सांगितले पाहिजेत.
भारतातील लोकसंख्या वाढत गेली तर सर्वांनाच असंख्य अडचणीचा सामना करावा लागेल. ही लोकसंख्या कशी वाढते ? त्यामुळे कुठले प्रश्न, अडचणी निर्माण होतात ? त्यावरील उपाय काय हे सगळे समजावून घेणे म्हणजेच लोकसंख्या शिक्षण.
स्त्रोत : लोकसंख्या शिक्षण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/28/2020
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्...
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...