योजनेचे नांव : यशवंत ग्राम समृध्दी योजना
योजनेचे स्वरुप : राज्यस्तरीय योजना
यशवंत ग्राम समृध्दी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील योजनेमध्ये गावक-यांचा सहभाग वाढवून निर्णय प्रक्रियेत त्यांना सक्रीय करुन घेणे गावाची गरज लक्षात घेवून कामाचे नियोजन करणे, ग्रामसभेचे महत्व वाढविणे, लोकवर्गणीद्वारे निधी उपलब्ध करणे, गावामध्ये लोकांच्या सहभागातून ग्राम समृध्दी करावी असा आहे.
ग्रामीण भागातील गावांचा विकास करण्यासाठी ग्रामसभेच्या मान्यतेने आवश्यक कामांची निवड करुन गावांमध्ये लोकसहभागातून पायाभूत सुविधा निर्माण करुन गावांची समृध्दी करण्याच्या उद्देशाने शासनाने सन 2002 पासुन यशवंत ग्राम समृध्दी योजनाराज्यात सुरु केली. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून सद्यस्थितीत दलित / आदिवासी वस्तीसाठी 10%आणि सर्वसाधारण वस्तीसाठी 15% लोकवर्गणी निश्चित केली आहे. ग्रामपंचायतीला दरवर्षी रु.10.00 लक्ष एवढया किंमतीचे विकासाचे काम करता येते. या योजनेंतर्गत प्रामुख्याने खालील कामे घेण्यात येतात-
सदर योजनेस ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाल्याने सन 2006 मध्ये जिल्हयांकडून मोठया प्रमाणात निधीची मागणी प्राप्त झाली, परंतू शासनस्तरावर आपु-या निधी उपलब्धतेमुळे संबंधीत जिल्हयांना पुरसा निधी उपलब्ध करुन देणे शक्य झाले नाही. त्यामुळे सन 2006-07 मध्ये दि.1 एप्रिल 2006 पासुन पुढील आदेश होईपर्यंत ग्रामपंचायतींकडून लोकवर्गणी घेण्यात येऊ नये असा तात्पुरत्या स्वरुपात निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून ते आतापर्यंत सदर योजना पूर्ववत सुरु झालेली नाही. ही योजना सुधारीत करुन राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे .
ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : ग्राम विकास विभाग
अंतिम सुधारित : 6/21/2020
गावानं ठरवलं तर गावं किती चांगलं काम करू शकतात याच...
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावा...
एकेकाळी अस्वच्छता त्यामुळे येणारे अनारोग्य यामुळे ...
राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व...