ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करणे, हे या विशेष प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहे. ग्रामीण युवकांना उपलब्ध असलेल्या किंवा होणाऱ्या संधीच्या दृष्टीकोनातून त्यांच्या कौशल्य क्षमतेचा विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाने सदर कार्यक्रम आखलेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रकल्प तयार करुन केंद्र शासनास पाठवावयाचे आहेत. कौशल्यवृद्धी प्रशिक्षण व वेतनी रोजगाराचे प्रकल्प NGOs, CSOs, CBOs, SHG Federations, पंचायतराज संस्था किंवा इतर शासकीय संस्थामार्फत राबविण्यात यावेत, असे केंद्र शासनाचे निदेश आहेत. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे प्रमाण हे 75% केंद्र शासनाचा हिस्सा, 25% राज्य शासनाचा हिस्सा असे असते. कौशल्यवृध्दी प्रशिक्षण व वेतनी रोजगाराच्या विशेष प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 41295 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले आहेत.
स्त्रोत : http://www.mahapanchayat.gov.in
अंतिम सुधारित : 1/30/2020
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला क...