<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; "><span>पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !</span></p> <h3 style="text-align: justify; ">मूळ संकल्पना व सुरुवात</h3> <p style="text-align: justify; ">संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.</p> <h3 style="text-align: justify; ">अधिक माहिती</h3> <p style="text-align: justify; ">तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-</p> <span> <ul> <li style="text-align: justify; "><span>पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.</span></li> </ul> </span> <ul> <li><span>पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.</span></li> <li><span>जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.</span></li> <li style="text-align: justify; "><span>पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.</span></li> </ul> <h3 style="text-align: justify; ">साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती</h3> <p style="text-align: justify; ">स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल!</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६</p> </div>