Accessibility options
Accessibility options
भारत सरकार
योगदानकर्ते : अॅग्रोवन07/10/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, तसेच जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा. याचबरोबरीने पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले इत्यादी बाबींचा विचार करून आवश्यकतेनुसार जल-मृद संधारणाचे उपाय करावेत.
१) शेतातील वाहते पाणी अडविण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने घातलेल्या मातीच्या अथवा दगडाच्या अडथळ्यास 'बांध' असे म्हणतात.
२) साधारणतः सहा टक्के अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात लागवडीयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात.
३) समपातळी बांधाच्या उपाययोजनेमुळे वाहत्या पाण्याचा संकलन काळ वाढतो व जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते. सलग ढाळाचे (उताराचे) विभाजन झाल्याने वाहणाऱ्या पाण्याची गती रोखली जाऊन धूप कमी होते, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
१) अनियमित अथवा अतिपावसाच्या प्रदेशात ढालीच्या बांधाची उपाययोजना केली जाते. या स्वरूपाच्या उपाययोजनेमध्ये बांधामधील जास्तीचे पाणी अधुपकारी गतीच्या आधारे बांधाच्या बाहेर काढून दिले जाते.
१) लागवडीस अयोग्य जमिनीमध्ये उताराला आडव्या असणाऱ्या समपातळी रेषेवर खोदलेल्या चरांना ‘समपातळी चर’ असे म्हणतात.
२) चरांमधून खोदलेल्या मातीच्या आधारे चराच्या खालच्या बाजूस बांध घालण्यात येतो. गरजेनुसार नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून वृक्षलागवडही केली जाते.
३) पावसाचे पाणी समपातळी चरांमध्ये साठावे यासाठी चरांचा आकार ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल एवढा ठेवावा.. दोन चरांमधील अंतर चार मीटर एवढे ठेवतात.
१) बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास टाळून जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चराची उपाययोजना अतिशय उपयुक्त आहे.
२) सदर चरांमध्ये ६ ते ८ महिने पुनर्भरणाची प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे त्याच्या खालच्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सदर उपाययोजना उपयुक्त आहे.
येत्या काळात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व कौशल्याने करावे लागते. काही वेळेस पाऊस पडतच नाही, तर कधी-कधी तो ऐन मोक्याच्या वेळेस ताण देतो. अशा वेळेस संरक्षित सिंचनाच्या आधारे पिकांना वाचवावे लागते. शेततळ्याच्या उपाययोजनेमुळे संरक्षित पाणी देणे शक्य असल्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये ही उपाययोजना महत्त्वाची समजली जाते.
वैजनाथ बोंबले - ९०४९५५९५५३.
संपर्क - ०२४६५-२२७७५७
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ म्हणून (कृषी अभियांत्रिकी) कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
कृषि विभागाच्या पुनर्रचनेनुसार प्रत्येक जिल्हा स्तरावर मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत असून, सदर प्रयोगशाळेत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी म्हणजे शेतक-यांना त्यांचे शेतातील मृद नमुन्यांचे पृथ:करण .
शेती विभाग महाराष्ट्र राज्य निर्मित मृद चाचणी चित्रफित
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत.
पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वाहत असते. अशा पाण्याचे संधारण आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास होय.
जल-मृद्संधारणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
मृद् व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात.
योगदानकर्ते : अॅग्रोवन07/10/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
93
कृषि विभागाच्या पुनर्रचनेनुसार प्रत्येक जिल्हा स्तरावर मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत असून, सदर प्रयोगशाळेत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी म्हणजे शेतक-यांना त्यांचे शेतातील मृद नमुन्यांचे पृथ:करण .
शेती विभाग महाराष्ट्र राज्य निर्मित मृद चाचणी चित्रफित
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत.
पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वाहत असते. अशा पाण्याचे संधारण आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास होय.
जल-मृद्संधारणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
मृद् व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात.