অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कापूस स्वच्छता मोहीम

कापूस स्वच्छता मोहीम

बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते.कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशिचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात रहू देतात.आणि मग कधी सवड असेल त्या वेळी नागरुन अगर उपटून पर्हाट्या काढतात.ही अगदी चुकीची पद्धत आहे. कारण पर्हाट्या तशाच शेतात रहू दिल्यास कपशिवारिल पुष्कळशा किडी रोग सुप्तावस्थेत पडून राहतात.आणि मग पुढच्या हंगामात अनुकूल हवामानात पुन्हा उद्भवतात आणि मग औषधांचा खर्च वाढतो. उत्पादन कमी होते.

  • पुढच्या हंगामात कापसावर जास्त प्रमाणात किड-रोग येऊ नयेत म्हणून कपाशीच्या पिकाच्या अवशेषाची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
  • कपाशीवर येनारया किडिंचा आणि रोगाचा प्रसार पूर्वीच्या पिकाच्या अवशेषापासून आणि काडीकचर्यापासून होतो. यासाठी कपाशी हंगाम संपल्यानंतर शेतातला काडीकचरा रोगट पाने यांसारखे अवशेष गोळा करून नायनाट व्हावा यासाठी स्वछता मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. अशी स्वछता मोहिम पूर्ण झाल्यानंतर रोगाच्या पुढच्या वाढीस आळा बसेल.
  • शेवटची वेचणी संपली कि, लवकरात लवकर परहाटया जनावरांना खाऊ घालून परहाटयाचे राहिलेले अवशेष मुळासह उपटून काढाव्यात.
  • परहाटया तशाच शेतात ठेवल्यास जमिनीताला अन्नांश खातात. जमिनीचा कस कमी होतो.म्हणून त्या मुळासह उपटून काढाव्यात.
  • अशा परहाटया जळणासाठी उपयोगी पडतात. अगर बारीक तुकडे करून आळीन्बिचे बेड तयार करण्यासाठी फारच उपयुक्त ठरतात.
  • कपाशीवरिल ठिपक्यांची बोंडेअळी शेतात शिल्लक राहिलेल्या कपाशीच्या परहाटयावर, फुटीवर तसेच भेंडी, अंबाडी यांसारख्या उन्हाळी पिकांवर पोसली जाते.
  • तर कपाशीवरील शेंदरी बोंडअळी जमिनीवर पडलेल्या कापसाच्या बोंडात अगर कपाशीच्या सरकित पुढच्या हंगामापर्यंत सुप्त अवस्थेत पडून राहते.
  • याशिवाय कवडी-करपा सारख्या रोगाचे जिवाणुही कापसाच्या शेतात पडलेल्या अवशेषात सुप्त अवस्थेत राहतात.
  • अशा सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या किडी-रोगाच्या बंदोबस्तासाठी कापूस स्वच्छाता मोहिम हाती घ्यावी आणि तीही त्या सर्व परीसरातल्या सर्व शेतकरयानि एका वेळी सामुदायिकरीत्या हाती घ्यावी. एकट्या दुसरयाने स्वच्छता मोहिम राबवून फारसा उपयोग होत नाही. म्हणुन सार्वजनिकरित्या स्वच्छता मोहिम राबवावी.
  • याशिवाय कपाशिचा खोडवा ठेवू नये. कपाशिच्या शेतातल्या तणाचाही नाश करावा. बांधाची स्वच्छता करावी.अशा शेतात उन्हाळ्यात भेंडी, अंबाडीसारखी पिके मुळीच घेवु नयेत.अशा प्रकारे सर्व प्रकारची स्वच्छता केल्यानंतर त्या क्षेत्राची खोल नांगरट लगेच करावी. म्हणजे नांगरटीमुळे उन्हाळाभर ती तापते त्यामुळे जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहिलेले किडी रोगाचे जीवाणु अवशेष उन्हामुळे मरून जातील.

अशा पद्धतीने कपाशीच्या क्षेत्रातील कापूस स्वच्छ्ता मोहिम राबवावी.

संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने )

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate