অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तलावातील गाळ किती प्रमाणात वापरावा

तलावातील गाळ किती प्रमाणात वापरावा

  1. तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकणमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहे. गाळमातीच्या वापरामुळे हलक्‍या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता तसेच तिची ओलावा साठवण क्षमतासुद्धा वाढविली जाते.
  2. योग्य प्रमाणात गाळमातीच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शिफारशीत खत कमी करता येणे शक्‍य आहे.
  3. तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्‍या जमिनीत सुपीकता वाढविण्याच्यो शेतात पसरली जाते. गाळमाती मिसळत असताना तिच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करावा. गाळमाती मिसळताना निरनिराळ्या प्रमाणात जमिनीत मिसळली जाते. काही वेळा जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.
  4. गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्‍या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे. गाळमाती व शेत जमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निर्धारित करावी.
  5. फळबाग लागवड करताना गाळमाती, खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेतात उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये भरावी.
  6. ज्या गाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आहे, अशी गाळमाती शेतात पसरू नये. पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती खोदून शेतात पसरण्यासाठी वापरू नये.

 

संपर्क : 0217 - 2373047 
विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate