पिकांच्या योग्य वाढीसाठी अनुकूल अशी जमिनीची कायिक स्थिति तयार करण्यासाठी पिक पेरण्यापूर्वी जी जी कामे केली जातात त्यास पूर्वमशागत, असं म्हटल जात.
ज्या जमिनीत पेरलेले बी चांगल उगवून त्याची जोमदार वाढ होऊन त्यापासून भरपूर उत्पादन मिळते ती जमीन चांगली तयार केलेली आहे, असं समजावं, बी पेरण्यायोग्य, जमीन ओलसर, वाफशावर, बारीक़ पोताची, साधारण घट्ट अणि जरुर तेवढी खोल असावी.
पूर्वमशागत ही फार महत्वाची मशागत आहे. या मशागतित नांगरट करावी लागते.योग्य नांगराने जमीन उत्तम प्रकारे नांगरुन उघडी करता येते. निघालेली ढेकळ फोडून चांगली भुसभूशीत करता येते.
चांगली नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन मुळ जमिनीत खोलवर पसरतात आणि भरघोस उत्पादन मिळत. नांगरटीचा चांगला आणि योग्य फायदा मिळवण्यासाठी टी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करन अत्यंत आवश्यक आहे.
नांगरटीच काम हे खर्चाच आणि कष्टाच काम आहे. पिकांची काढणी झाल्याबरोबर नांगरट करण फायद्याच आहे. कारण त्या वेळी जमिनीत योग्य तो ओलावा असतो, त्यामुळे बैल नांगरटीला कष्ट पडत नाहीत.मोठी ढेकळ निघत नाहीत.दमणुक कमी होते आणि नांगरटीनंतरची जी जी कामं करायची असतात ती सर्व कामं कमी त्रासाची आणि सुलभ होतात. मात्र पिक काढल्यानंतर जसजसा उशीर होईल तसतसा जमिनीतला ओलावा कमी होऊन जमीन टणक बनते. नांगरटीचा त्रास होतो. मोठी ढेकळ निघतात. म्हणून नांगरट योग्य वेळी करणं फार महत्वाचं असत, खरीप रब्बी अगर इतर पिक निघाल्या नांगरट करावी.
नांगरट उताराला आडवी करावी. दर वर्षी नांगरट करावी लागते, तर काही जमिनीला दोन अगर तिन वर्षांनी जरुरी असते. शिवाय दर वर्षी नांगरट केल्यामुळे कही ठराविक खोलीवर कठिन थर निर्माण होतो. त्यामुळे निचरा होत नाही. म्हणून हा तयार झालेला कठिन थर सब सॉयलर या नांगराने नांगरट करावी.
संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)
अंतिम सुधारित : 6/5/2020
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमा...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनी...
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून क...