पिकांना महत्त्वाच्या पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार एक किंवा दोन पाणी द्यावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेमधील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो. पीक सुकण्यास सुरवात झालेली असते, तसेच मातीतील ओलावा कमी झाल्यामुळे जमिनीस भेगा पडण्यास सुरवात झालेली असते. कमी पाणी साठ्यामध्ये हलके पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी प्रवाही सिंचन पद्धतीने 10 सें.मी. पेक्षा कमी पाणी बसू शकत नाही. त्यातील बरेचसे पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
1) कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी द्यावे.
2) दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी द्यावे.
3) भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
1) गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
2) मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावे लागते.
3) पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या वेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.
1. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - पेरणीनंतर 18 ते 21 दिवस
2. कांडी धरण्याची अवस्था - पेरणीनंतर 40 ते 45 दिवस
3. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था - पेरणीनंतर 60 ते 65 दिवस
4. दाणे भरण्याची अवस्था - पेरणीनंतर - 80 ते 85 दिवस
पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात.
1. गहू पिकास एकत पाणी देणे शक्य असल्यास ते 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
2. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 व दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
3. गहू पिकास पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22, दुसरे पाणी 40 ते 42 व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
1. वाढीची अवस्था (20 ते 40 दिवस)
2. फुलोरा अवस्था (40 ते 60 दिवस)
3. दाणे भरण्याची अवस्था (70 ते 80 दिवस)
1) जिरायती हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
2) बागायती हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमी कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते.
3) मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी 30-35 दिवसांनी व दुसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे.
4) हरभरा पिकाला जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे.
5) जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा, मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
1) मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणी नंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे फायद्याचे ठरते.
2) दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना 55 ते 60 दिवसांनी द्यावे.
3) पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे.
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...