सूर्यप्रकाशात वाळविणे आणि यांत्रिक निर्जलीकरणाने फळे, भाजीपाल्यातील पाणी कमी करता येते. निर्जलीकरण करताना पदार्थाचा रंग, सुवास व पोषण घटक यांचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
फळे, भाज्या सुकवून टिकविण्याची निर्जलीकरण करावे. फळे व भाज्यांमध्ये 60 ते 95 टक्के पाण्याचा अंश कमी करून साखर आम्ल व घन पदार्थांचे प्रमाण वाढविले जाते, त्यामुळे सूक्ष्म जिवाणूंची वाढ होत नाही, फळे व भाज्या जास्त काळ टिकतात. सूर्यप्रकाशात वाळविणे आणि यांत्रिक निर्जलीकरणाने फळे, भाजीपाल्यातील पाणी कमी करता येते. द्राक्षे, बोर, खजूर व अंजीर या पद्धतीने वाळविण्यासाठी वेळ जास्त लागतो; परंतु खर्च कमी येतो; परंतु या पद्धतीने वाळविल्यास पदार्थ वाया जाऊन गुणवत्ता कमी होते.
विविध प्रकारची रसायने वापरून अन्नातील जीवाणू नष्ट करणे आणि पदार्थ दीर्घकाल टिकविता येतात. आपल्याकडे मुख्यतः बेंझाईक ऍसिड व सल्फर ऑक्साईड ही रसायने पदार्थाच्या प्रमाणानुसार वापरली जातात. सर्वसाधारणपणे सरबते, सिरप, केचप, चटण्या या पद्धतीने टिकविले जाते.
साखर हे एक उत्तम अन्नसंरक्षक आहे. मात्र यासाठी पदार्थातील साखरेचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. जॅम, जेली, मार्मालेडससारखे पदार्थ साखरेने टिकविले जातात.
मिठाचे 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण वापरल्याने जिवाणूंची वाढ थांबते. मिठाच्या बाबतीतदेखील साखरेप्रमाणेच ऑस्मोसीसची क्रिया घडते. शिफारशीनुसार मिठाचा वापर करून पदार्थ टिकविले जातात.
ओलसर पदार्थांमध्ये जिवाणूंची वाढ लवकर होते. उन्हात वाळवून अथवा कृत्रिम पद्धतीचा वापर करून पदार्थातील ओलसरपणा काढून संपूर्णपणे वाळविल्यास या जिवाणूंची वाढ होऊ शकत नाही. पर्यायाने पदार्थ जास्त टिकतात.
अगदी कमी तापमान जिवाणूंची वाढ थांबविण्यास परिणामकारक ठरते. फळे, भाजीपाला, मांस इत्यादी या पद्धतीने साठविता येते.
संपर्क - सौ. अम्रिता राऊत - 9604576835
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे विषय विशेषज्ञ (कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी) म्हणून कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतात ह्या वंशातील एकूण १४ जाती असून त्यांपैकी ३-...
आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छाम...
या विभागात आंब्याच्या झाडाला अनियमित फळे का येतात...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.