तृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा उपयोग करण्यासाठी तृणधान्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करणे फायदेशीर ठरते. बाजारपेठेत अशा पदार्थांना चांगली मागणी आहे.
भारतामध्ये जगाच्या तुलनेत ३० टक्के तृणधान्याचे उत्पादन होते. सध्या नाचणी, बाजरी, भगर यांचा जास्त प्रमाणात वापर होतो. यातील आहारमूल्य लक्षात घेता वरी, राळा यांचा खाद्यपदार्थांमध्ये वापर वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्यामध्ये उपलब्ध असलेली खनिजे आणि जीवनसत्त्वामुळे या धान्यांकडे स्वास्थ्यवर्धक म्हणून पाहिले जाते.
पिठाची भाकरी तयार केली जाते. याचबरोबरीने खारोड्या आणि पापड्यांनाही चांगली मागणी आहे.
भाकरीच्याबरोबरीने अलीकडच्या काळात पापड्या आणि बिस्किटांनाही चांगली मागणी वाढली आहे. नागलीची खीरही आरोग्यवर्धक आहे.
उपवासासाठी भगर वापरली जाते. याचबरोबरीने भगरीच्या पापड्यांनाही चांगली मागणी आहे.
ही दोन्ही तृणधान्यांचे मध्यप्रदेशात चांगल्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यांचा उपयोग करण्यापूर्वी त्याच्या वरचे साल काढून त्यानंतर दळून पिठाची भाकरी केली जाते. याच्या पापड्याही चांगल्या तयार होतात.
राळ्याचा उपयोग टरफल काढून भात आणि खिरीसाठी केला जातो.
वरीचा तांदूळ काढून त्याच्या खाद्यपदार्थात वापर करतात. यापासून भात व खीर तयार केली जाते.
ज्वारीची भाकरी खाण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. पिवळी ज्वारी ही बीड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत पेरली जाते. तिचा वापर खाद्योपयोगात केला जातो.
महाराष्ट्रामध्ये मक्याचे उत्पादन वाढत आहे. विशेषकरून कोंबडी खाद्यासाठी मक्याची मागणी आहे. पंजाबमध्ये मक्याची भाकरी आणि मोहरीच्या पानाची भाजी (साग) हिवाळ्यात आवडीने खाल्ली जाते.
खाद्योपयोग- ७५ टक्के
पशुखाद्य - ११ टक्के
बी/ बियाणे - २ टक्के
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ - २ टक्के
प्रक्रियेत वाजाणारे घटक - १० टक्के
लेखक : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४,
(लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)
अंतिम सुधारित : 7/4/2020