रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.
कच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशिनवर टाकून रिळावर घेतले जाते.
रिळावर घेतलेला धागा हा 16/18, 20/22 इ. डेनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन धागे, तीन धागे अगर चार धागे एकत्र घेतले जातात यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल टिङ्कस्ट करुन डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करुन टिङ्कस्टींग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.
डबलिंग करुन तयार झालेल्या धाग्यास पीळ देवून मजबूती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल टि्स्ट देण्यासाठी एक वा अनेक मशिन उपयोगात आणतात.साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात 8-9 पिन सिंगल स्वरुपाचे तर ताणा धाग्यास एका इंचावर 19-20 डबल पीळ दिले जातात.
रेशीम धाग्यास पीळ दिल्यानंतर आखूड व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये टिङ्कस्टेड सूताचे ड्रम स्टँडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 15-20 मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.
कच्च्या सूताप्रमाणे पक्क्या सूताच्या पुन्हा लडया तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंग व वाईंडींग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लिचिंग करुन रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के टिङ्कस्टेड सूत यामध्ये 3-4 टक्के घट येते.
वार्पिंगमध्ये इंग्रजी व्ही आकाराच्या क्रीलवर 100-100 रिळ असे दोन्ही बाजूस ताणा धाग्याचे अडकवून त्या धाग्यांचा पट्टा फणीतून घेवून धागे क्रॉस करुन बीम भरण्याचे ड्रमवर 1ध्45.65 मीटर1ध्2 कापडाचा तागा लांबीनुसार गुंडाळला जातो. वार्पिंग झाल्यानंतर सर्व पट्टे धाग्याचे बीमवर गुंडाळले जातात व भरलेले बीम हातमागावर सांधणीसाठी जोडली जाते.
बीमवरील धागे पूर्वीच्या मागवरील धाग्यांना जोडून वही फणीमधून ओढून विणकाम सुरु करणे यास बीम सांधणी म्हणतात. बीम सांधणीस एक कामगारास 3 दिवसांचा कालावधी लागतो.
बाणा धागा रिळावरुन कांडीवर चरख्याच्या सहाय्याने अगर 10 कांडया अर्ध्या हॉर्सपॉवरच्या मोटारने एकाच वेळी भरता येतात. व भरलेल्या कांडयावरील धागा हातमागामध्ये रुंदीच्या धाग्याकरिता वापरला जातो.
बीम सांधणी आणि कांडी भरणे झाल्यानंतर वीणकाम करता येते. एक विणकर एका हातमागावर 3-4 मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम कापडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो. हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे तीन प्रकार असून यंत्रमाग व स्वयंचलित यंत्रमाग असे दोन प्रकार आहेत.
अशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. प्रथम त्यांनी प्रत्येकी दरमहा 500 रूपये जमा करून अल्प बचत योजना सुरू केली. या करीता त्यांनी बँक ऑॅफ महाराष्ट्र, शाखा - शेणोली येथे बचत गटाचे स्वंतत्र खाते सुरू केले. त्या खात्यामध्ये वर्षाला 78 हजार रूपये जमा होऊ लागले व यातुनच त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. व संगोपनगश्ह बांधणी करीता बचत रक्कमेतुन पैसे घेतले. बँक अधिकाऱ्यांनी सदर योजनेस प्रोत्साहन म्हणुन 60 हजार फिरते भांडवल (सी. सी.) दिले. सदर रकमेमुळे प्रत्येकाचे स्वंतत्र संगोपन निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकाला रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास 50 एकरवर तुतीची लागवड झाली. कराड तालुक्यातील शेतकरी रेशीम उद्योग पहाण्याकरीता शेणोली गावामध्ये येऊ लागले. संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकरीता आवश्यक असणारे साहित्य व औषधे वाजवी दराने स्थानिक पातळीवर लवकरच उपलब्ध होण्याचे दश्ष्टीने विक्री केंद्र सुरू केलेले आहे. अशा प्रकारे सुशिक्षित तरूणांनी एकत्र येऊन रेशीम उद्योग केल्यास त्यांची निश्चितच अर्थिक उन्नति होईल.
रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन
स्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/5/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...