अतिउत्पादन घेण्याच्या लालसेने व पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वारेमाप वापर वाढला आहे. त्यातच गावरान बीयाणे जाऊन संकरित बियाणे लागवडीकडेही कल वाढला आहे. मात्र, फळे व भाजीपाल्यावरील कीटकनाशकांचे अंश थेट मानवी शरीरात जाऊ लागल्याने आज मानव विविध आजारांना बळी पडू लागला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन राज्य शासनाने ‘सेंद्रिय शेती धोरण’ जाहीर केले आहे. त्यासाठीच सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेतीचे फायदे काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गचक्राच्या साह्याने करावयाची शेती. त्यात नैसर्गिक घटकांचा अधिकाधिक पुनर्वापर आणि कृत्रिम घटकांच्या कमीत कमी वापरासह या दोन्ही घटकांची योग्य सांगड घालणे आवश्यक असते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील अल्पभूधारक शेतकरी तानाजी निकम यांनी अवघ्या दीड एकर शेतात लहरी निसर्गाशी दोन हात करून प्रतिकूल परिस्थितीतही कल्पकतेने सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. या प्रयोगांतून त्यांनी जगातील सर्वात उंच भात पीक, सर्वाधिक शेंगा देणारी तुरीची झाडे व हरभऱ्याच्या पिकाचा जागतिक विक्रम केला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील लोहारा येथील कृषिभूषण शेतकरी विश्वासराव पाटील यांनी दोन सरींआड कमी पाण्यात उसाचे अधीक उत्पादन घेण्याचा प्रयोग केला आहे. याशिवाय गडचिरोलीतील धनराज जैन या आदिवासी भागातील शेतकऱ्यानेही केवळ पाऊण एकर जमिनीतून भाताचे उच्चांकी उत्पादन मीळवले आहे.
- अशोक देशेट्टी, केव्हीके, पाल ता. रावेर जि. जळगाव
अंतिम सुधारित : 6/5/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...