1. जनावरांना मुक्त फिरण्याची मोकळीक, त्यामुळे व्यायाम झाला. ती आनंदी राहिली. बैठक व्यवस्थित झाली.
रवंथ जास्त करणे शक्य झाले.
2. दोन वेळ चारा व गरजेनुसार पाणी पिणे शक्य झाले.
3. गोचीड, मस्टायटीज किंवा अन्य आजार होण्यावर प्रतिबंध आला.
4. जनावरे फिरत राहिल्याने त्यांच्या नख्यांची वाढ झाली नाही.
5. मजूर कमी लागले. त्यावरील खर्चात बचत झाली.
6. एकूण व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात वाढ झाली.
दुग्धउत्पादन कायम टिकविण्यासाठी कानवडे यांनी चारा, पाणी व आरोग्य व्यवस्थापनावर मुख्य भर दिला आहे.
शंभर ट्रे असलेल्या एक शेडनेटमध्ये "हायड्रोपोनिक्स' (मातीविना शेती तंत्र) तंत्राद्वारा दोन किलो मका बियाण्यापासून सुमारे पंधरा किलो चारा उत्पादित केला जातो.
ऍझोलानिर्मितीही केली जाते.
सकाळी सात व सायंकाळी सहा वाजता खाद्य देण्यात येते. दररोज सकाळी सात वाजता गव्हाणी साफ करून त्यात स्वच्छ पाणी सोडण्यात येते. शेण तीन ते चार महिन्यांनी काढण्यात येते.
वेळच्या वेळी लसीकरण होते.
1. जनावरांसाठी नव्वद टक्के पचनास योग्य
2. त्यासाठी शेतजमिनीची आवश्यकता नाही.
3. पाण्याचा कमीत कमी वापर.
4. कमी खर्चात हिरवा चारा.
(आता चार शेडनेट तयार करण्यात येणार आहेत.)
कानवडे यांच्याकडे सद्यःस्थितीत 30 ते 40 टन मुरघास उपलब्ध आहे. सुमारे तीन महिने तो पुरेल. चविष्ट, रुचकर असल्यामुळे जनावरे तो आवडीने खातात. चाऱ्यात मळी, गूळ, मीठ, युरिया, मिनरल मिक्श्चर किंवा प्रथिने आदी घटक मिसळले तर चारा अधिक चवदार होत असल्याचा कानवडे यांचा अनुभव आहे. मुरघास साठ दिवसांपर्यंत मुरवून पुढे एक वर्षापर्यंत वापरता येतो. दूध उत्पादनात या खाद्याचा महत्त्वाचा वाटा राहिला.
वर्षाला सुमारे 12 ते 15 गायी दुधाळ असतात. प्रति गाय दररोज दोन्ही वेळा मिळून सरासरी 15 लिटर दूध देते. काही गायी 18 ते 20 लिटरही दूध देतात. गावातील डेअरीला 22 ते 23 रुपये प्रति लिटर दराने दूध घातले जाते. प्रति गायीपासून प्रति दिन 330 रुपये मिळतात. त्यातील चारा किंवा एकात्मिक आहार, मजूर, औषधोपचार, वाहतुक असा मिळून सुमारे दीडशे रुपये खर्च असतो. पूर्वी हाच खर्च 250 रुपये असायचा. मात्र घरीच विविध खाद्याची निर्मिती सुरू केल्यापासून त्यावरील व मजुरांवरील खर्चात बचत केली आहे.
महिन्याला सुमारे आठ ते दहा ट्रॉलीपर्यंत शेणखत मिळते. पिकांचे अवशेष, पाचट यांचाही वापर शेणखतात होतो.
वर्षातून कालवडींचीही विक्री होते.
मुक्त गोठ्यात 44 गायींमागे 44 कोंबड्या सोडण्यात आल्या आहेत. गोचीड, अळी व माशांची अंडी त्यातून साफ होतात. गोठा सफाईसाठी मजुरांची गरज कमी होते. कोंबड्या दिवसाकाठी 30 ते 40 अंडी देतात. त्या विक्रीतूनही उत्पन्न मिळते.
नगर जिल्हा परिषदेकडून आदर्श गोपालक म्हणून अनिल कानवडे यांचा गौरव झाला आहे.
कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर यांच्यातर्फेही विशेष शेतकरी संशोधक पुरस्काराने सन्मान झाला आहे.
कानवडे यांच्या आदर्श गो प्रकल्पाला एक हजार शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. प्रत्येकाला सविस्तर मार्गदर्शन कानवडे यांच्यातर्फे करण्यात येते.
दुग्ध व्यवसायातील महत्त्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कानवडे कुटुंबातील महिलांकडे सोपविण्यात आली आहे. अनिल यांच्याकडे गोठा व्यवस्थापन, सुयोग व योगेश यांच्याकडे दूध व चारा देणे, अनिल यांच्या पत्नी सौ. शीतल व योगेश यांच्या पत्नी सौ. रूपाली यांच्याकडे गोठा स्वच्छता व चारा व्यवस्थापन ही जबाबदारी आहे.
अनिल कानवडे यांचा सहभाग असलेला साईप्रसाद शेतकरी दूध, भाजीपाला उत्पादक गट कार्यरत आहे.
गटातील शेतकऱ्यांनी सामुदायिक पाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारून जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.
अनिल यांनीही डेअरी सुरू केली असून, सातशे लिटरपर्यंत दूधसंकलन होते.
संपर्क : अनिल कानवडे : 9766070344
सुयोग कानवडे : 9011883844
लेखक : गणेश फुंदे
माहिती संदर्भ : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...