Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : दत्तात्रय उरमुडे07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
काऊरवाडी ईजारा (जि. यवतमाळ,) येथील युवा शेतकरी शिवशंकर मारुतराव वाटोळे यांनी खडकाळ जमिनीत फळे, फुले, भाजीपाला, ऊस, कापूस यांसारखी विविध पिके घेत आपली शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतीला पाणी, कष्ट करण्याची हिंमत आणि नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास पडीक, खडकाळ रानामध्येही चांगले उत्पादन मिळवता येते. त्याचा प्रत्यय यवतमाळ येथील काऊरवाडी-ईजारा (ता. महागाव) येथील शिवशंकर वाटोळे या 23 वर्षीय युवा शेतकऱ्याच्या मिश्र शेतीतून येतो.
शिवशंकर यांचे वडील मारुतराव हे अन्य शेतकऱ्यांकडे सालाने कष्ट करीत असत. असे करत त्यांनी अडीच एकर शेती खरेदी केली. त्यातून पुसद जवळील देवी तांडा येथे आठ एकर शेती केली. मात्र पाणी नसल्याने पीक उत्पादनामध्ये मर्यादा येत. ही शेती विकून शिवशंकर यांनी अडीच वर्षांपूर्वी काऊरवाडी येथे पाण्याची उपलब्धता होऊ शकेल, अशा 13 एकर पडीक व खडकाळ जमिनीची खरेदी केली. माळरानावरील झाडे-झुडपे स्वच्छ करीत जमिनीच्या चढ-उताराप्रमाणे भाग केले. या ठिकाणी चाळीस फूट खोल विहीर खोदूनही आवश्यक तितके पाणी लागले नाही. मग एक विंधन विहीर घेतली. तिला भरपूर पाणी लागले. हे पाणी विहिरीत सोडून सर्वत्र पाइपलाइन करून ठिबक आणि तुषार पद्धतीचा वापर सुरू केला.------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत - अॅग्रोवन
सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत.
गुहा (ता. राहुरी, जि. नगर) - गावात काही भागांत पाणीटंचाईची मोठी समस्या जाणवते. रब्बीत हरभऱ्यासारखे पीक अर्थशास्त्राच्या दृष्टीने फारसे लाभदायक ठरत नव्हते.
सुमारे वीस वर्षे विविध वाहनांवर चालकाची चाकरी केल्यानंतर गावामध्येच पिकअप गाडी घेऊन टोमॅटो वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला.
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन ही क्षारयुक्त झाली आहे. परिणामत: त्या जमिनीवर शेती करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
तुमचे पीक नियोजन चांगले असेल आणि सकारात्मक वृत्ती ठेवून कष्टाने सर्व साध्य करण्याची तयारी असेल, तर छोट्या क्षेत्रातूनही शेती आणि पर्यायाने उत्तम जीवन जगता येते.
सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील जलयुक्त शिवार योजनेची यशोगाथा.
राजेंद्र गवळी
3/18/2015, 10:21:53 AM
मी नाशिक जिल्ह्यातील आहे. मला apple बोरांची रोपे कुठे मिळतील?
Contributor : दत्तात्रय उरमुडे07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
88
सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत.
गुहा (ता. राहुरी, जि. नगर) - गावात काही भागांत पाणीटंचाईची मोठी समस्या जाणवते. रब्बीत हरभऱ्यासारखे पीक अर्थशास्त्राच्या दृष्टीने फारसे लाभदायक ठरत नव्हते.
सुमारे वीस वर्षे विविध वाहनांवर चालकाची चाकरी केल्यानंतर गावामध्येच पिकअप गाडी घेऊन टोमॅटो वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला.
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन ही क्षारयुक्त झाली आहे. परिणामत: त्या जमिनीवर शेती करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
तुमचे पीक नियोजन चांगले असेल आणि सकारात्मक वृत्ती ठेवून कष्टाने सर्व साध्य करण्याची तयारी असेल, तर छोट्या क्षेत्रातूनही शेती आणि पर्यायाने उत्तम जीवन जगता येते.
सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील जलयुक्त शिवार योजनेची यशोगाथा.