आत्मा'अंतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पाच्या माध्यमातून उन्हाळी हगाम २०१४-१५ मध्ये चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यात नावीन्यपूर्ण अशा प्लॅस्टिक आच्छादन तंत्रज्ञानावर आधारित भुईमूग पीक प्रात्यक्षिके 'आत्मा'च्या शेतकरी गटामार्फत राबविण्यात आली. भुईमूग पिकासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असल्याने प्लॅस्टिक मल्चिंग पद्धतीने भुईमूग पिकाची लागवड करण्यासाठी येथील शेतक-यांचा कल वाढला आहे.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये केळी व कपाशी ही फ्केि मोठ्या प्रमाणात घेतली जातात. केळी व कापसाची काढणी झाल्यानंतर बहुतांश शेतकरी गहू, हरभरा, मका, कांदा व उन्हाळी भुईमूगा या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे, अनियमित पाऊस, बाढ़ते तापमान, थडींचा कमी-अधिक कालावधीं व खालावलेली भूजल पातळी यामुळे समस्यामुळे या पिकांच्या उत्पादकर्तेबाबत अनेक आव्हाने उभी आहे.
भुईमूग फिकाच्या बाबतीत थंडीमध्ये लागवड केल्यास उगवण शक्तींवर परिणाम होता, तर उशिरा लागवड केल्यास मॉन्सूनपूर्व पावसामुळे फ्किाचे नुकसान होते. या अडचणींमुळे तालुक्यातील भुईमूग फिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. देशाची तेलबियांची गरज व भुईमुगास मिळणारा भाव लक्षात घेता, चागलें व्यवस्थापन केल्यास हैं पीक फायर्देशीर असें नगदी पीक ठरू शकतं. अशा परिस्थितीत चाळीसगाव ग्रंथील शेतकरी गटाने आत्मा' कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावर भुईमुगाला पर्यायी पिकाचा विचार न करता मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रकल्प संचालक, आत्मा यांनी शेतक-यांना सुचविले.
सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती शेतक-यांना दिली. रांजणगाव येथील शेतकरी शास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन केंद्र व कृषि विभागाच्या अधिका-यांनी मल्विंगवरील भुईमूग लागवड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. यानंतर चार २o शेतक-यांनी प्रत्येकी १ एकर याप्रमाणे २o एकर क्षेत्रावर प्लॅस्टिक आच्छादनावर भुईमूग पिकाची लागवड केली.
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील बाळू ,खंडू ,महाजन यांच्या मल्चिंगवरील भुईमुगाचे उत्पन्न व खर्च
दिवसांत जमिनीचे तापमान ४० ते ५° से. ने वाढले. त्यामुळे उगवण व सुरवातीची वाढ जोमाने झाली. थंडीच्या कालावधीतही लवकर पेरणी करणे शक्य झाले. चांगली उगवण व लागवडीचे अंतर एकसारखे ठेवले गेल्यामुळे एकरी रोपांची संख्या वाढली. तसेच पाण्याच्या बाष्पीभवनाचा रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरले. गादीवाफ्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा चांगल्या पोसल्या गेल्यामुळे उत्पादनात वाढ झाली. सर्व शेतक-यांना सरासरी एकरी १८ ते २१ क्रिटल उत्पादन मिळाले.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/3/2023
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विश...
शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मा...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार ज...
राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जै...