माझे नाव मधुकर किसन मिरगे (रा. मालखेडा, तालुका : भोकरदन, ज़िल्हा : ज़ालना) माझे एकुन क्षेत्र 2.४० हे. असुन हंगामी बागायती जमीन आहे. मी शेती ही पुर्वी प्रमांनेच करत होतो त्यामुळे शेतीला जास्त खर्च व कष्ट करावे लागत असे. आम्ही कापुस व मकका या दोन पिकावर आमचा जास्त भर असायचा कपाशीसाठी आमचा जास्त भर असायचा. कपाशीसाठी आम्हाला जास्त रासायनिक खत व महागडी औषधाचा जास्त वापर करावा लागत असे त्यामुळे खर्च देखील जास्त लागायचा व खतविषयी जास्त ज्ञान नसल्यामुळे कोनीही सागीतलेली औषधे मी फवरित असे. दिवसेनदिवस खर्च वाढत चालला व उत्पन्नात घट होत चालली त्यामुळे हातात पैसे देखिल कमी पडु लागले. कुंटुबातील समस्या दिवसेन दिवस वाडु लागल्या त्या मुळे असा विचार करण्यास भाग पडलो की आता शेती करायची नाही. शेती दुसयाला देउन मजुरीने काम करावे.
2008 ला वॉटर संस्था मालखेडा गावात आली व त्यानी पाणलोटा विषयी माहीती दिली हे काम आपल्या शिवारात झाल्यास त्याचा फायदा होवुन शकतो हे गावक-याच्या लक्षात आले व सर्व गावयानी सह्कार्य केले. 2011साली कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासाठी शेतकयाची शेती शाळा सुरु झाली.त्यामध्ये त्यानी प्रथम माती परीक्षण करण्यास सागितले व जमिनीत कोणते घट्क कमी आहेत व कोणते घट्क जास्त त्या प्रमाने खताचा वापर करावा. या विषयी माहीती मिळाली. रासायनिक खत व औषधाचा वापर मोठ्या प्रमाणावर होवू लागला त्यामूळे मानवी जिवणावर त्याचा किती विपरीत परीणाम होवू लागला या विषयी सत्यमेव जयते हा क्रार्यक्रम दाखविला.त्यामुळे आपण रोज किती विष खातो या विषयी आतापंर्यत कधी विचार केला नवथा. जमिनीला खताची किती गरज आहे याची माहीती नसल्यामूळे पिक चागले येण्यासाठी खत व औषधचा वापर जास्त प्रमाणत करत असे त्यामुळे जमिन नापीक बनत चालली होती. हे सर्व माझ्या लक्षात आले. जमिनीचा पोत सुधरायचा असेल तर सेंद्रीय खत व औषधचा वापर करावा लागेल. अशी माहीती शेती शाळेतुन मिळाली आणि मी पिक पध्द्त बदलली. मी जमिनीच्या क्षमतेनुसार पिक घ्यावयाचे ठरविले. मी कापुस ऐवजी तुर,सौयबीन,अशा स्वरुपाची पिके घेण्यास सुरवात केली व यावर सेंद्रिय खत व औषधचा वापर करु लागलो. त्यामुळे मला खूप फायदा झाला. सेंद्रिय औषधचा वापर केल्यामुळे पिके शेवट पर्यत हिरवीगार राहु लागली. लागणारा खर्च सुध्दा कमी लागु लागला. जमिन सुपिक बनु लागली. रासायनिक खत व औषधाचा वापर पुर्णपणे बंद करता येणार नाही कारण जमिनीला त्याची सवय लागली आहे.मी ही सवय हळू ह्ळू मोड्णार. त्यामुळे मी 1एक्कर पुर्णपणे सेंद्रिय खत व औषधाचा(अमृत पाणी, गांडुळखत, दशपरर्णीअर्क) याचा वापर करुन शेती करण्याचे ठरविले.
आशय लेखक : अनिल हिवाळे (भोकरदन)
अंतिम सुधारित : 3/21/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...