बदलत्या हवामानाचा अंदाज येत नसल्यामुळे शेती उत्पादनावर होणाऱ्या विपरीत परिणामाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. हवामानाच्या बदलाचा शेतीवर परिणाम होऊ नये व वेळीच शेतकऱ्यांना त्याबाबत अवगत करता यावे यासाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाने फार्मर पोर्टल सुरु केले असून या पोर्टलवर शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केल्यावर त्यांना हवामान, पीक पद्धती, बाजारभाव आदींची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
भारत सरकार कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी फार्मर पोर्टल सुरु केले असून यामध्ये कृषी संबंधित वेगवेगळ्या विषयाची माहिती राज्यनिहाय उपलब्ध आहे. सदर पोर्टलमध्ये www.mkisan.gov.in मधून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यास हवामान, कीड-रोग नियंत्रण, बाजारभाव, पीक उत्पादन इत्यादीबाबत एस.एम.एस.प्राप्त करुन घेण्याकरिता नोंदणी करता येणे सहज शक्य आहे.
सदर सेवेमध्ये आतापावेतो जवळपास 16 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून ते या सेवेचा लाभ घेत आहेत. ही सेवा शेतऱ्यांसाठी विनामूल्य असून या सेवेद्वारे वेळीच माहिती एस.एम.एस.द्वारे प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामाचे नियोजन करणे सूलभ झाले आहे.
या सेवेत संकेतस्थळ, पत्रव्यवहार अथवा मेलद्वारे सहभाग घेता येऊ शकतो. नवीन नोंदणी धारकांनी www.mkisan.gov.in वर जाऊन Registration for SMS या विकल्पातून नोंदणी करता येऊ शकते अथवा कृषी उपसंचालक, प्रकल्प कृषी आयुक्तालय, शिवाजी नगर पुणे-5 यांच्याकडे पत्राद्वारे किंवा kisansms.mh@gmail.com या e-mail वर स्वत:ची माहिती पाठवून स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा, पिकांची माहिती अंतर्भूत करुन नोंद केल्यास शेतकऱ्यांना शेतीसंबंधी व हवामानासंबंधीची माहिती एसएमएसद्वारे अगदी विनामूल्य प्राप्त करता येणार आहे.
-जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/10/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...