या उद्दिष्टांतर्गत मुख्य घटक आहे विविध सेवांचे वितरण करण्यासाठी मुख्य सुविधा म्हणून अतिवेगवान इंटरनेट. डिजिटल ओळख, आर्थिक समावेश समर्थ करणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापित करण्याची व सामाईक सेवा केंद्र सहज उपलब्ध होतील याची खात्री करण्याची योजना आहे.
ली अनेक वर्षे, विविध राज्य सरकारांनी व केंद्रीय मंत्रालयांनी ई-प्रशासनाचे युग सुरु करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सार्वजनिक सेवा वितरण सुधारणे व त्या उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.
डिजिटल जोडणी ही मोठ्या प्रमाणावर समतोल साधते. विविध प्रदेशांमध्ये व सामाजिक-आर्थिक विभागांमध्ये विखुरलेले भारतीय डिजिटल नेटवर्कच्या आधाराने एकमेकांशी मोबाईल फोन व संगणकांच्या मदतीने अधिकाधिक जोडले जात आहेत
डिजिटल इंडिया ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट प्रामुख्याने तीन क्षेत्रांवर केंद्रित आहे: