वेबसाईट : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यातील पाणी पुरवठा व मलनि:सारण क्षेत्रातील योजनांसंदर्भात संकल्पनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत तसेच आर्थिक नियोजन आणि योजनांची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती या सर्व बाबींमध्ये संपूर्णत: मजीप्राचा एकात्मिक सहभाग होता. सन 1997 मध्ये उपरोक्त अधिनियमांत सुधारणा करण्यात येऊन 'महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाचे' 'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण' असे नामकरण करण्यात आले. तथापि, 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्तीनुसार शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्याचे संपूर्ण अधिकार शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल केले. बव्हंशी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कल योजना स्वत: राबविण्याकडे असल्याने मजीप्राला मिळणारा महसूल कमी झाला आहे. मजीप्राच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/24/2019
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...