‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून या तक्रारींचे 21 दिवसात निराकरण केले जाईल.
महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहोत
आपली तक्रार योग्य वर्गवारीत दाखल करायची आहे. (केवळ मंत्रालयातील विभाग). एकदा आपण तक्रार दाखल केली की, आपला ट्रेकिंग क्रमांक तयार होईल. त्या ट्रेकिंग क्रमांकावरूनच नागरीकांना आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येईल. आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तुम्हाला त्यावरूनच कळेल. सक्षम अधिकारी यांचा आपली तक्रार २१ दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न असेल.
आपल्या तक्रारीचे समाधान झाले की नाही याबाबत नागरिक "समाधानी आहोत" किवा "समाधान झाले नाही" या दोन पर्यायांच्या माध्यमातून आपला प्रतिसाद देवू शकतात.
स्त्रोत : https://grievances.maharashtra.gov.in/mr
अंतिम सुधारित : 7/30/2020
पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्...
सर्व सहकारी सस्थांचे नियामक मंडळ म्हणून त्यांच्या ...
राष्ट्रीय ई-शासन योजना (NeGP-National eGovernance ...
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ...