अपंग, गतीमंद अनाथ बालकांच्या संगोपनासाठी सातत्याने धडपडणाऱ्या वझ्झर येथील शंकरबाबा पापडकर यांनी अपंग, गतीमंद बालकांच्या पुनर्वसनासोबतच विविध प्रजातीचे पंधरा हजार वृक्ष लावून जगविण्याचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे
पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय विविधता, (२) जाती विविधता आणि (३) परिसंस्था विविधता.
संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे. पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत.
जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते.
वन्यजीवांची विविधता पाहण्यासाठी विविध अधिवासात जाऊन निरिक्षण करावे लागेल.
झाडं तोडल्यामूळं जंगल संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना संगमनेर व अकोले तालुक्यातील शिसवद, खडकी बु।। , पुरुषवाडी, वरुडी पठार, माळेगाव पठार, जवळे बाळेश्वर, भोजदरी, कोठे खुर्द, खांडगेदरा गावातील ग्रामस्थांनी, स्वंयसाहयता समुहांनी, युवकांनी,जैवविविधता उपक्रमातंर्गत विविध प्रजातींच्या बिया गोळा संकलित करण्याचा उपक्रम केला आहे.
शेतकरी ते ग्राहक मालाची थेट विक्री या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 51 लाख रुपयांच्या तांदळाची विक्री झाली आहे. यामुळे दलालांची मध्यस्थी संपून शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्याबरोबरच ग्राहकांनाही वाजवी दरात चांगल्या दर्जाचा तांदुळ उपलब्ध झाला आहे.
गोड्या पाण्याची एक परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या पाण्याची परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात.
वन्यजीवांचे निरिक्षण करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
नाशिकला हिवाळ्यात तसा जास्तच गारठा असतो. बऱ्याचदा शहरावर सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर असते. आज अशाच वातावरणात नांदूर मधमेश्वर अभयारण्याकडे जाताना उत्साह वाटत होता. माणसांच्या गर्दीपलिकडले विश्व आनंददायी असते, याचा अनुभव कोकणात असताना अनेकदा घेतला आहे. असाच रोमांचित करणारा अनुभव या अभयारण्यात मिळेल, या आशेने या भेटीचे नियोजन झाले होते.
रत्नागिरी म्हटले की हापूस आंबा, काजू, फणस, सुपारी अशा फळपिकांची रेलचेल असणारी भूमी. आपल्या अद्वितीय चवीने जिल्ह्याला ओळख प्राप्त करुन देणारा हापूस आंबा, काजू, सुपारी ही फळपिके जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्वाचा घटक ठरली आहेत
घराशेजारील मोकळ्या जागेत सांडपाण्याचा वापर करून लावलेला भाजीपाला म्हणजेस थोडक्यात परसबाग .यात मेथी, पालक, दोडका, कारली, वांगी, मुला, भेंडी, मिरची, वाल, भोपळा, इ. भाज्या व काही औषधी वनस्पती , शोभेच्या वनस्पतीची लागवड केली जाते.
पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.
परिसंस्थेकडून, आणि पर्यायाने जैवविविधतेकडून, जे जे फायदे अनेक स्वरुपात आपणाला मिळत असतात त्यांना परिसंस्था-सेवा म्हणतात.
उपनिषदामध्ये झाडाच्या बी ला मानवी जनुकाची उपमा दिली आहे. झाडाचं बी आणि मानवी जनूकं सारखेच. बी जमिनीत पुरवल्यावर पावसाच्या थेंबामुळं ते अंकुरतं, रोपटं होतं.
वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या जीवाश्मांकडे मनुष्याचे लक्ष प्राचीन काळीही गेलेले होते व तेव्हापासून त्यांच्या उत्पत्तीविषयी निरनिराळ्या कल्पना सुचविल्या गेल्या होत्या; पण आधुनिक विज्ञानांची थोडी प्रगती होईपर्यंत त्यांचे वास्तविक स्वरूप कळणे शक्य नव्हते.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाची बैठक होती. माझ्यासाठी विषय एकदमच नवीन होता... पण इतर शासकीय बैठकीप्रमाणे ही ही एक बैठक, त्यात काय एवढं विशेष असं समजून बैठकीला गेले... बैठकीत विषयसुचीप्रमाणे चर्चा सुरु झाली आणि ही बैठक नेहमीपेक्षा किती वेगळी आणि छान आहे हे जाणवायला लागलं...
या पक्ष्याचा नमुना थॅामस सी जेर्डन या ब्रिटीश पक्षी शास्त्रज्ञाने गोदावरी आणि पेन्नार नदीच्या खोर्यातून १८४८ मध्ये जमा केला. या पक्षीशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ या पक्ष्याला जेर्डनस कोर्सर असे म्हंटले जाते. जेर्डन च्या मते हा पक्षी आंध्रप्रदेश मधील नेल्लोर, कडप्पा, भद्राचलम, अनंतपुर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसत असे आणि या जिल्ह्यांच्या मर्यादित भागात दिसत असल्याने तो प्रदेशनिष्ठ असावा असा त्याचा विचार होता.
जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात, या पैकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड “ब्लाकीश्तोन मत्स्य घुबड” आहे तर सर्वात लहान आहे “एल्फ घुबड”.
आज आपण भारतातील एका दुर्मिळ आणि रहस्यमयी अशा हिमालयात राहणाऱ्या पक्ष्याची माहिती घेऊ
सायबेरीयन क्रौंच हा भारतात सापडणाऱ्या अति संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक होय. पालास नावाच्या पक्षी शास्त्रज्ञाने १७७३ हा पक्षी जगासमोर आणला.
जळगाव शहराची तहान भागविणारा मेहरूण तलाव. शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. म्हणून सकाळी फेरफटका मारण्यासाठी तेथे लोकांची गर्दी होत असते.
सध्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ अशा विविध कारणांमुळे शेती करणे जिकरीचे झाल्यामुळे तरूण वर्ग शेतीकडे पाठ फिरवू लागला आहे.
माती आणि त्याखाली सूक्ष्मजीवांपासून बिळ करून राहणाऱ्या उंदरांसारख्या सजीवांची विविधता प्रचंड मोठी आहे. सध्या वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांना हे जीव कशा प्रकारे प्रतिसाद देतात, यांचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.
आपले सण व उत्सव यांचा निसर्गाशी अतूट संबध आहे. तो असायलाही हवा परंतु त्यामुळे त्यामुळे जैवविविधतेला धोका पोहायला नको.
२००२ मध्ये आलेल्या जैवविविधता कायद्यामध्ये पी.बी.आर् (People’s Biodiversity Register) ची संकल्पना मांडलेली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व परिसरातील जैवविविधतेची ओळख होऊन त्यांनी जैवविविधता संवर्धनात हातभार लावावा या हेतूने वॉटरशेड ऑर्गनाइजेशन ट्रस्ट ( वॉटर )महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता नोंदवही - मार्गदर्शक पुस्तिका ( CBR-Children's Biodiversity Register A field guide ) तयार केली आहे.
सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले काळेवाडी हे कर्जत तालुक्यातील एक गाव. नेरळ पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर.
आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 3 जून ते 9 जून या कालावधीत या दिनाचे औचित्य साधून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा केला जातोय.