घराशेजारील मोकळ्या जागेत सांडपाण्याचा वापर करून लावलेला भाजीपाला म्हणजेस थोडक्यात परसबाग .यात मेथी, पालक, दोडका, कारली, वांगी, मुला, भेंडी, मिरची, वाल, भोपळा, इ. भाज्या व काही औषधी वनस्पती , शोभेच्या वनस्पतीची लागवड केली जाते. यामुळे रोज नवीन , ताजी व आवडीची भाजी खायाला मिळते . त्यामूळे आरोग्य चांगले राहते व शरीरास पोषक जीवनसत्वे मिळतात . पैशाची बचत होते . यात भाजीपाला पिकाबरोबर औषधी वनस्पतीची लागवड केली जाते.
विशेष म्हणजे यातील बऱ्याच भाज्यांचे गावठी वापरून लागवड करण्यात आली आहे . हया भाज्या खतविरहित आहेत . यातून मिळालेले बीज पुढील वर्षी लागवडी साठी वापरले जाते . त्यामुळे यातून गावठी बियाणाची जोपासना होते . म्हणजे एक प्रकारे भाजीपाला पिकांचे व औषधी वनस्पती चे जतनच होतयं . वरुड़ी पठार येथील महिला गेल्या 3- 4 वर्षापासून रोज ताज्या भाज्या खातात. सध्या दुष्काळी परस्थिति आहे . पाणी टंचाई आहे . तरीही त्यांच्या परसबागेत काही भाज्या आहेत .
आपणही जैवविविधता संवर्धनासाठी हा छोटासा उपक्रम राबवू या आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोंका पर्यंत पोहचवू या !
लेखन: बाळू निवृत्ती भांगरे
अंतिम सुधारित : 8/9/2020