অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्न शिजवताना पाळावयाची पथ्ये

पोषक द्रव्यांवर होणारे परिणाम आणि पाळावयाची पथ्ये

  1. जेव्हा भाजीपाला बारीक चिरला जातो, त्यावेळी त्यातील पाचकरस (एन्झाइम) जास्त प्रमाणात मोकळे होतात आणि त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होतो.
  2. भाज्या जास्त शिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.
  3. भाज्या उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे जीवनसत्त्व आणि पाचकरस (एन्झाइम) पाचकरस एकदम कमी होतात.
  4. पदार्थ जास्त शिजवू नयेत, अर्धवट कच्चेच ठेवावेत. जेव्हा जास्त शिजवणे आवश्यक असेल तेव्हा मात्र मोठ्या आचेवर आणि थोडावेळ शिजवावेत.
  5. खाण्याच्या आधी फार वेळ अन्न पुन्हा – पुन्हा गरम करू नये. तसे केल्याने जीवनसत्त्वांचा प्रमाण कमी होते.
  6. भाज्या पाण्यात घालून बराच वेळ ठेवणे किंवा भाजी चिरल्यानंतर धुणे यामुळे भाज्यांतील ‘क’ जीवनसत्त्व कमी होते.
  7. वाळविल्यामुळे सर्व भाज्या आणि फळांमधील ‘क’ जीवनसत्त्व कमी होते. फक्त आवळ्यातील ‘क’ जीवनसत्त्व वाळविल्यामुळे नष्ट होत नाही.

 

स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate